पान:वनस्पतिविचार.pdf/134

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०६     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----

झाल्यामुळे देठ ज्या ठिकाणी डहाळीशी चिकटलेला असतो, त्या ठिकाणच्या पेशी फाटू लागतात. पेशींतील ऐंद्रिय आम्लें पेशिभित्तिका विरघळवून फाडण्याचे कामी मदत करतात. होतां होतां डहाळीचा संबंध अगदी तुटून जातो. मग आकस्मिक वारा अथवा दुसरे अन्य कारण यामुळे ते पान सहज गळून जाते. पाने गळण्यापूर्वी ही पूर्वतयारी झाली पाहिजे; नाहीं तर पाने सहज गळत नाहींत. मुद्वाम एखादेवेळेस मोडकी फांदी अथवा मोडकी पाने झाडावर ठेवावीत. ती वाऱ्यामुळे सहसा गळत नाहीत. त्यापेक्षा आपोआप गळणारी पाने लवकर पडतात. शिवाय गळलेली पाने तपासली असतां, जणू व्यवस्थितपणे तीं चाकूने इतर भागास न दुखवितां कापिली असावीत असे वाटते.

 पाने गळण्यापासून बाष्पीभवन कमी करण्याव्यतिरिक्त दुसरा एक फायदा वनस्पतीस मिळतो, व तोही पहिल्या इतकाच महत्त्वाचा असतो. मुळांतून पुष्कळ निरिंद्रिय द्रव्ये पानामध्ये रसाबरोबर येतात. वनस्पतीस निरुपयोगी द्रव्ये बाहेर टाकण्याकरितां गुदद्वारासारखी विसर्जन अंगे नसल्यामुळे जी निरुपयोगी निरिंद्रिय द्रव्ये पानांत सांठतात, त्यांचे विसर्जन पाने गळल्याने पूर्ण होते. नाही तर असल्या निरुपयोगी द्रव्यांच्या भाराने पाने वांकून जातील व आपले कर्तव्य करण्यास चुकतील. तेव्हां अशाचे लवकर विसर्जन होणे फायदेशीर असते. सालीचे विसर्जन ह्याच तऱ्हेचे फायदेशीर होते.

---------------
प्रकरण १३ वें.
---------------
क्षार, कार्बन् वायू व हरितवर्ण शरीरें.
---------------

 पुष्कळवेळा सांगण्यात आले आहे की, श्रमविभागाचे तत्त्व वनस्पतिजीवनचरित्रांत नेहमी आढळते. कांहीं पेशींनीं अन्न व पाणी मिळवावे, कांहींनी पौष्टिक वायु शोषण करावा, काहींनी त्यांची योग्य जागी ने-आण करून त्यापासून ऐंद्रिय पदार्थ बनवावेत, तसेच ज्या ठिकाणी त्या ऐंद्रिय वस्तूंची जरुरी असेल, त्या ठिकाणी पोचविण्याची तजवीज करावी. पाणी व निरिंद्रिय पदार्थ जमिनीतून कसे शोषिले जातात, व त्यांचे पानांत कसे