पान:वनस्पतिविचार.pdf/120

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९२     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----

असतो. त्यामुळे कठीण व टणक जमीन असली तरी त्यांतील द्रव्ये ह्या आम्लाचे योगाने विरघळतात. विरघळल्यानंतर हे पदार्थ पाण्याबरोबर पेशीचे आंत शिरतात. म्हणून हे आम्लाचे बाहेर जाणे तोट्याचे नसून फायदेशीर असते. अशारीतीने द्रव्य-मिश्रित पाणी शोषिल्यावर सजीवतत्त्व आपले घटणात्मक कार्य सुरू करिते. ह्या शोषित द्रव्यांपैकी कांहीं द्रव्ये नवीन सजीवतत्त्व उत्पन्न करण्यांत खर्चिली जातात. कारण सजीवतत्त्वांची परंपरा कायम राखिली पाहिजे. सजीवतत्वापासुन पेशीभित्तिका अथवा तिची वाढ होत असते. कांहीं जीवनकण ह्या कामीं खर्च होऊन कांहीं जडस्थाने तयार करण्यांत खर्च होतात, याप्रमाणे कांहीं द्रव्यांची विल्हेवाट येथेच लागते. तसेच जुने केंस जमिनीच्या खरखरीत कणाशी संबंध पावल्यामुळे झिजून शोषणक्रियेच्या कामी निरुपयोगी होतात. त्यांची दुरुस्ती अथवा नवीन व्यवस्था करणे हे सजीवतत्त्वाचे कर्तव्य असते.

 हे केंस जमिनीच्या भुसभुशित व हवायुक्त पोकळ्यांत घुसून तेथून पाणी व त्याबरोबरच इतर उपयुक्त पदार्थ शोषण करितात. केसाच्या बाह्यबाजूस जमिनीच्या मातीचे कण चिकटून राहतात. केसाच्या बाह्यत्वचेमध्ये भित्तिकेवर चिकट डिंक उत्पन्न होऊन, त्या योगाने ती द्रव्ये भित्तिकेवर घट्ट चिकटतात. ती लवकर जात नाहीत. त्यांचा अर्धवट जवळ जवळ आंत शिरकाव झाला असतो.

 पाण्याची उपयुक्तता- मुळे आपली जमिनीत घुसण्याची दिशा वारंवार बदलतात. जिकडे जिकडे त्यास मऊ जागा आढळते, अथवा जी जागा अन्न पुरविणारी असुन जेथे पाण्याचा भरपूर सांठा असतो, त्या जागेकडे ती आपला मोर्चा फिरवितात. मूळावर गुरुत्वाकर्षण शक्तीचा अंमल असतो, पण त्याबरोबरच आवश्यक कर्तव्य जे अन्नशोषण व संशोधन इकडे लक्ष्य पुरवून वारंवार दिशा बदलीत ती खाली खाली घुसत जातात. मुळ्यांचे अगर पाण्यासंबंधी फारच तीक्ष्ण असते, असे म्हटले तरी चालेल. त्यांस हे उपजत ज्ञान असते. प्रथम मुळे जर खडकाळ थरांत घुसली असली व जवळच दुसरा पाण्याचा थर असेल, तर लागलीच त्यांस उपजतज्ञान होऊन त्यांची अत्रे पाण्याचे थराकडे वळू लागतात. मुळांच्या वाढत्या बिंदूवर सर्द अथवा सुक्या परिस्थितीचा परिणाम होऊन वाढतां बिंदु सर्द बाजूकडे वाढू लागतो, व