पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/574

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दुमजली इमारतीचा पुंडावा. وافادا निर्माण करून देणीया पहिल्या संकरविवाहाची अशास्रता कायद्यानें आरंभीं दूर करितां येईल; पण अशा त-हेचा विवाह करणारांस व त्याची पुढील संतति यांस, संकीर्ण का होईना, पण हिंदुत्व जर पाहिजे असेल तर त्यांनी संकरजातीस उक्त असलेले विवाहाचे धर्मसंस्कारही पाळले पाहिजेत, ए-हवीं त्यांचे हिंदुत्व नष्ट होईल असें न्यायत: व हल्लींच्या कायद्यानेंही प्राप्त होतें. असेो. हें बिल ना. पटेल यानीं परत न घेतल्यास याबद्दल पुढे पुष्कळच भवति न भवति होणार आहे, व या भवति न भवतींत आणखी काय मुद्दे निघतात हे आजच मागता यावयाचे नाही. म्हणून आज वादातील मुद्दयांचा वर लिहिल्याप्रमाणे फक्त उपन्यास करून आजचा हा लेख येथे पुराकरतो. पुढे जरूर पडेल त्याप्रमाणे जास्त मनी करू.

  • दुमजली इमारतीचा पुंडावा.

स्वराज्य-मग ते स्थानिक असो. प्रातिक असेो अथवा सार्वदेशिक असेोस्वराज्य प्राप्त झाल्यावर वादग्रस्त मृद्दयाचा निर्णय कसा करावयाचा याचा एक धोटाळा परवा येथ किलॉस्कर नाटकगृहात प्रो. शकरराव भागवत याचे अध्यक्षतग्वाली पुणे शहरातील मतदाराची म्हणून जी एक जाहीर सभा भरली होती तीत चागत्या रीतीने निदर्शनास आला. आजपयेत म्हणजे नोकरशाहीच्या अमलात सवै सत्ता वरिष्ठ प्रतीच्या गो-या नोकराच्या हातात असल्यामुळे केोणत्याही बाबतात त ठरावतील ती पूर्व दिशा असा व्यवहार होता व काहीं थेोड्या बाबी खेरीजकरून अत्यापही आहे. या नोकरशाहीच्या विरुद्ध जर कोणाचे काहीं मत असेल तर ते लोकाच्या ठिकठिकाणी जाहीरसभा भरवून त्या सभेमार्फत किंवा ज्या ठिकाणीं लोकाचे प्रतिनिधि जमतात अशा कग्रेिससारख्या संस्थामार्फत नोकरशाहीस कळवावे लांग; आणि त्याचा पाडाव करण्याकरिता नोकरशाही काहीं लोकास हार्ती धरून त्यांच्याद्वारा लोकमत आपल्याच बाजूचे आहे असें जगास भासविण्याचा प्रयत्न करी. हिंदूंनी काही गोष्ट मागितलीं की, मुसलमानानीं नाहीं म्हणावें, आणि हिंदू मुसलमान एक झाले तर हिंदू-हिदूंतच ब्राह्मण व ब्राह्मणेतर किंवा मागसलेल व पुढारलेले असा नवा मतभेद घडवून आणवावा, अशा प्रकारे नोकरशाही वेळ मारून नेत असे; व अद्यापही नेत आहे. स्वराज्याचे हक्क प्राप्त झाल्यानतर हे प्रकार चालतील की नाहीं; न चालल्यास त्याला दुसर कोणते स्वरूप येईल आणि त्या स्वरूपाचा उपयोग कसा करावा लागेल याचा विचार करणे आता जरूर आहे. लोक म्हणजे सामान्यत: सर्व जनसमूह असा नेहमी आपण अर्थ समजतों, व एका दृष्टीनें तो खराही आहे. किंबहुना पूर्ण लोकसत्तात्मक स्वराज्य म्हणजे

  • केसरी, तारीग्व १० माहे फेब्रुवारी सन १९२०