निर्बन्ध ठेवावा लागेल. कारण विवाह हा एक करार आहे, ती पाचदहा वर्षाचा किंवा आजन्म करारही होऊ शकेल, खुषीचा सौदा आहे, धर्मवचन नव्हे इत्यादि विचित्र कल्पना अद्याप ख्रिस्ती राष्ट्रातही रूट झाल्या नाहीत; मग हिंदुधर्माची गोष्ट कशाला ? सकर ज्ञातीतील विवाहाकरितां कोणता सस्कार उपयोगात आणावा हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे; पण त्याचा विचार शास्त्री लोक करतील. सध्या आमचे एवढेच म्हणणे आहे कीं, विवाह हा हिंदुधर्म- शास्त्राप्रमाणे एक धर्मसस्कार आहे व ब्राह्मणत्वादि विशिष्ट जातीची अपेक्षा नसली तरी हिंदु ज्याला राहावयाचे आहे त्याने विवाहसंस्काराबद्दलचे हे धर्ममत झुगारून देऊन चालावयाचें नाहीं, जो आपले विवाहादि संस्कार हिंदुधर्म- शास्त्राप्रमाणे करीत नाहीं तो हिंदु कसला ? हिंदुसच नव्हे तर खिश्रन आणि मुसलमान म्हणवून घेणान्यासही हाच नियम लागू होतो; आणि याच हेतूने नुसत्या नोदणीने विवाह लावणान्यास "न हिदुर्न यवनः असा प्रतिज्ञालेख १८७२ च्या कायद्याने लिहून देण्यास सांगितलेले आहे. नोंदणी हा धर्मसंस्कार नव्हे, दिवाणी करार आहे; तेव्हा प्रत्येक हिंदु म्हणविणाराने केवळ या करारावर अवलबून न राहता आपले विवाहविधि धर्मसस्काराने उरकले पाहिजेत असे उघड प्राप्त होते. संकर जातीकरिता जो हा विवाहसस्कार करावयाचा तो ज्या दोन जातीचा संकर झाला त्यापैकी कोणत्याही जातीचा असूं शकेल, पण तो संस्कार त्या रीतीनें उरकल्याखेरीज त्याची संतति हिंदुधर्मशास्त्राप्रमाणे हिन्दु मानली जाणार नाहीं. मग हे हिदु परपरागत असोत किंवा वैद्याच्या मिशनरी हिदुधर्माप्रमाणे हिंदु करून घेतलेले असोत; जो कोणी हिदु आहे त्याचा विवाहसस्कार हिंदुधर्ग- संस्काराप्रमाणे झाला पाहिजे; मग त्या विवाहाची तुम्ही पुढे नोदणी करा अगर न करा, तो प्रश्न निराळा.
वरील सर्व गोष्टीचा विचार करता ना. पटेल यांचे बिल अपुरेच नव्हे तर पुष्कळ अंश हिंदुधर्माच्या विरुद्ध आहे असे दिसून येईल. हे बिल पुढे आण- ताना ज्या लोकाची गैरसोय किंवा अडचण ना. पटेल याच्या डोळ्यापुढे होती, त्यांच्याबद्दल आम्हांसही सहानुभूति आहे. किंबहुना त्या लोकाची अडचण दूर करू नये असे हिंदु समाजही म्हणणार नाही. पण ज्या लोकाकरिता हे बिल आणावयाचे तें बिल फक्त जातिदृष्ट्या निषिद्ध विवाहापुरतेच असावे; नोदणी होवो किंवा न होवो, विवाह धर्मसंस्काराप्रमाणे झाले पाहिजेत; आणि विवाहित दपत्यास किंवा त्याच्या संततीस जे वारसाचे हक्क मिळावयाचे ते सकर विवाद कर- पान्या इसमास मूळ पुरुष कल्पून त्याच्या पुढच्या संततीपुरतेच पाहिजेत, इत- राचा वारसा या संततीस मिळू नये; एवढे तरी निर्बंध या बिलात अवश्य असले पाहिजेत असे आमचें आज म्हणणे आहे. किंबहुना हे निर्बन्ध घातल्याखेरीज अशा प्रकारचे विवाह हिंदूचे आहेत किंवा त्यापासून होणारी संतति हिंदू आहे असें हिंदुसमाज कबूल करणार नाहीं असे आम्हास वाटतें, सकरजाती
,
पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/573
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५५६
लो० टिळकांचे केसरीतील लेख.