पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/561

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

년 g g लो० टिळकांचे केसरींतील लेख. वेदाध्यापनाचा तेवढा अधिकार केवळ ब्राह्मणांसच असला तरी ज्याला इल्लीं आम्ही शिक्षण म्हणतों तें केोणत्याही वर्णाला सुलभ होतें. म्हणून ब्राह्मणांनीं ब्राह्मणेतरांना शिक्षणरहेित ठेवलें या म्हणण्यास कांहींच आधार नाहीं. असें असतां शिक्षणाकडे इतर वणीनीं द्यावें तितकें लक्ष दिलें नाहीं. याचे खरें कारण त्यानीं आपापल्या धंद्याकडे विशेष लक्ष दिलें व शिक्षणाकडे दुर्लक्ष केलें; कारण नुसत्या पुस्तकी व कारकुनी शिक्षणाला त्या वेळीं मान मुळीच नव्हता हेंच होय. आपापल्या धंद्याकडे लक्ष देण्यापासून इतर वर्णाचा आर्थिकदृष्टया फार फायदा झाला, व ब्राह्मण म्हटले कीं ते निर्धन व ब्राह्मणेतर म्हटले कीं ते सधन असा जो सामान्य भेद दिसतो तो त्यामुळेच उत्पन्न झाला आहे. पण या स्थितीस अनुलक्षून ** आम्हाला द्रव्योत्पादक धंदा इतर वर्णांनीं करूं दिला नाहीं ” असे जर ब्राह्मण म्हणतील तर ती जशी त्यांची चूक होईल तशीच “ आम्हाला ब्राह्मणांनीं सुशिक्षित होऊं दिलें नाहीं ” असे ब्राह्मणेतरानीं म्हणणें हीही चूकच आहे. एकानें द्रव्योत्पादक शिक्षण व द्रव्य पसत केले, दुस-यानें पुस्तकी विद्या व निर्धनत्व पसंत केलें, अशी केवळ आपखुषीनें पूर्वी वाटणी झाली; याबद्दल परस्पर दोष कोणासच लावतां येणार नाहीं. बरे, पूर्वी काय झाले असेल तें असेो, पण आधुनिक काळात तरी ही स्थिति पालटू लागलीच आहे कीं नाहीं ? महाराष्ट्रातील ज्ञानश्वरादि ब्राह्मण साधु-संतानीं सस्कृत विद्येचे स्तोम कमी करून केवळ जनतेविषयीच्या प्रीतीमुळे मराठीमध्ये वेदविद्या आणण्याचा प्रयत्न केला, हें विसरता कामा नये. आणि आता गेल्या शंभर वर्षात इंग्रजी अम्मल झाल्या पासून तर विद्या व शिक्षण हें वाटेल त्याला घेण्यास सुलभ झाले असून ब्राह्मणलोक ब्राह्मणेतराना ती मिळण्यास हरकत करीत नाहींत, इतकंच नव्हे, तर ब्राह्मणेतराना सुशिक्षित करण्यास ब्राह्मण पुढारीपणाने प्रयत्न करीत आहेत. पण अजूनही पुस्तकी विद्या मिळविण्याचे कामीं ब्राह्मणेतर उदासीन असून त्याच्यावर विद्या मिळविण्याच्या कामी साक्त व्हावी असे म्हणण्यांत ब्राह्मणच पुढारी आहेत. तात्पर्य तुलनात्मकदृष्टया ब्राह्मणेतर अशिक्षित असल्यास त्याबद्दल ब्राह्मणांच्या नांवानें कोणीही खडे फोडण्याचे खरें कारण नाहीं; व आज सरकारदरबारात लोकसंख्येच्या मानानें ब्राह्मण अधिक असले तर त्याबद्दल त्यांना दोष लावण्याचेही कारण नाहीं, राज्यकारभाराला सुशिक्षण अवश्य असतें, व तें शिक्षण संपादन केल्यामुळे, स्वतः सरकार मनांतून ब्राह्मणांवर रुष्ट असताही, सार्वजनिक कामकाजात केवळ ब्राह्मणांना लोकसंख्येच्या प्रमाणाबाहेर जागा त्यांना द्याव्या लागल्या; या गोष्टीला सरकारचा जसा नाइलाज झाला तसाच ब्राह्मणांचाईो नाइलाज आहे. कौन्सिलच्या निवडणुकींत ब्राह्मण येतात ते काय ब्राह्मणच एकजात मतदार आहेत म्हणून ? कायद कौन्सिलात गतवर्षी सरकारतर्फे हिंदी लोकांच्या नेमणुका झाल्या त्यांत ना. कामत, ना. साठे, ना. नाईक, ना. लछुभाई सामळदास इत्यादि ब्राह्मणांच्या नेम