पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/541

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

.ली० टिळकांचे केसरींतील लेख ب : ما सारासार विचार करणे एवढेच कांहीं सदाचरणाचे तत्त्व नाही; कारण एखाद्या गरीबाने एखाद्या सत्कृत्याकडे दोन पैसे आणि त्याच कामासाठी एखाद्या लक्षाधीशानें शंभर रुपये दिले तरी त्याची नैतिक योग्यता आम्हीं एकच समजते. यावरून शुद्ध, निष्काम व सर्वाभूती सम झालेली, अतएव फलासंगविरहित बुद्धि, हेंच काय ते गीतेंत वार्णलेले सदाचरणाचे मूळ हेोय, असें सिद्ध होतें. * पत्रं पुष्पं फलं तेोयं ? याचा भावार्थ हाच असून अशा रीतीनें जो आपलें कर्तव्य करतो त्यास कमांचे बधन न लागता स्वधर्मानें लोकसग्रह केल्याच श्रेय संपादन करून त्याच कर्माने अखेर यास मेोक्ष मिळतो, म्हणून मोक्षासाठीं साधन म्हणूनच नव्हे तर, ज्ञानोत्तरहि निष्काम कर्मे अवश्य केली पाहिजेत असें गीतेचे पुनः पुनः सांगणें आहे; व याचमुळे अखेर स्वधमाकरिता युद्ध करण्यास अर्जुन प्रवृत्त झाला आहे. वर जी बुद्धीची निष्काम अवस्था वर्णन केली ती अध्यात्मविचारार्ने प्राप्त होते हें रवरें. पण ती सिद्ध होण्यास अध्यात्मविचार हा मार्ग क्लेशमय असून भक्तिमार्गानें तोच हेतु सुलभ रीतीनें प्राप्त हेोतो, आणि हा मार्ग प्रत्यक्ष असल्यामुळे त्याचे आचरणही सुखानें घडतें असें गीतेचे यापुढे दुसरे महत्त्वाचे सांगणें आहे. पण यावरून निष्कामकर्मविरहित भक्तीच गीतेंत प्रतिपाद्य आहे, असे होत नाही. भक्ति हैं साधन आहे, साध्य नव्हे; व सर्व साधनात हें साधन जरी सुलभ असले तरी त्याने निष्काम व समबुद्धि संपादन करून कर्म सोडावीं असे सिद्ध न होता उलट त्या बुद्धीनें जगातील सर्व व्यवहार करीत रहार्वे हेंच गीतेचे अखेरचे सागणे आहे. यानें मोक्षप्राप्ति होते, इतर्केच नव्हे तर जगांतील सुस्थितिही कायम रहाते. यासच ज्ञानकर्म-समुच्चयपक्ष असे म्हणतात, व तोच गीतेतील प्रतिपाद्य विषय होय. म्हणजे केवळ कर्मफलत्यागपूर्वक ज्ञान किंवा केवळ भक्ति हें गीतेतील अंतिम ध्येय नव्हे. हा ज्ञानकर्म- समुच्चयपक्ष गीर्तेतच नव्हे तर ईशावास्यादि उपनिषदातही वर्णिलेला आहे. किंबहुना गीता हें मोक्षदृष्टया संसार कसा करावा याचे शास्त्र आहे, संसार सोडून देण्यासाठीं गीता सांगितलेली नाहीं. आधुनिक पाश्चिमात्य पंडित आपली संसारशास्ने आधिभौतिक पायावर रचीत असतात. पण हा पाया अपुरा असल्यामुळे तो सोडून देऊन संसारशास्त्राचा मोक्षशास्त्राशी म्हणजे अध्यात्मशास्त्राशी गीतेनें उत्तम मेळ घालून दिलेला आहे. गीर्तेत जर कांही अपूर्वता असेल तर ती हीच होय. नुसता वेदात किंवा नुसती भक्ति प्रतिपादन करणारे ग्रंथ पुष्कळ आहेत. पण त्यातून प्राय: अखेर कर्मसंन्यासरूपी चतुर्थाश्रम प्रतिपादलेला असतो. पण गीतेचा कटाक्ष तसा नाही. संन्यास ह्या शब्दाचा अर्थ व्यापक करून कमांचा संन्यास न करिता फलाचा संन्यास करा, किंवा संन्यासबुद्धी ठेवून केवळ इद्रियार्नेच जगांतील सर्व व्यवहार करीत जा, कर्मे सोडणे इष्ट नाहीं, तीं अवश्य केली पाहिजेत, असा गीतेचा भावार्थ