पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/540

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीभगवद्गीतारहृस्य. ५२३ होय; व तो निष्कामबुद्धीनें करणे म्हणजे लोकोपकारही निराभमान बुद्धीनें करणें हेंच मनुष्याचे इहलोकांतील परम ध्येय होय. ही स्थिति प्राप्त होणें अत्यंत दुर्घट आहे खरें; पण अभ्यासानें तीही साध्य होते, असें गीतेचे सागणें आहे. निष्कामबुद्धि किंवा फलाशात्याग याचा अर्थ बराच खोल असल्यामुळे त्याचाही येथे थोडासा खुलासा केला पाहिजे.फलाशात्याग म्हणज फलत्याग किंवा कर्माचे फल भिळाले तरीही ते सोडून देणे, असा अर्थ नव्हे. गीतेला या जगांतील सवै कर्म काढून टाकावयाचे नाही. जै सामान्यत: काम्य असतें तें मात्र निष्काम करावयाचे आहे. कर्म सोडण्यास गीता केोठेच सागत नाही. अर्थात् कर्म करण्याची इच्छा मनुष्यास असली पाहिजे इतकेंच नव्हे तर त्या कर्मापासून पुढे काय परिणाम होण्याचा संभव आहे याचे त्यास ज्ञान असून तदनुसार त्या कर्माची योजना करणेही मनुष्याचे काम आहे. एरवीं त्याच्या सर्व क्रिया वेड्यासारखा होतील; म्हणून कर्म करण्याची इच्छा अगर हेतूचे ज्ञान किंवा योजना सोडून द्या, असा फलाशात्याग या शब्दाचा अर्थ करता येत नाहीं. किंबहुना या सर्व मनेोवृत्ति मनुष्यास परिणामी दु:ख कारक किंवा बंधकारक होऊं शकत नाहीत असें म्हटले तरी चालेल. दु:खाचे मूळ फलाच्या ठायीं जी मनुष्याची ममत्वयुक्त आसक्ति असते त्यात आहे, कर्मीत नाही; व कर्म करण्याच्या इच्छतही नाहीं. * कर्मण्येवाऽधिकारस्त मा फलेषु कदा च न ' या कर्मयोगाच्या गीतेंतील चतु:सूत्रीचा अर्थ हाच होय.यासच इंग्रजीत Duty for duty's sake म्हणजे केवळ कर्तव्य म्हणून (कार्यमित्येव) जें काय करावयाचे ते करावें असें म्हणतात. गीतेचा सर्व कटाक्ष याच तत्त्वावर आहे; आणि असें करीत असता हत्त्यसारखी घोर क्रिया करावी लागली तरीही त्याचा लेप कत्यास लागत नाही. उदाहरणार्थ, भ्रूणहत्त्येसारखे दुसरे पाप नाहीं; पण आडवें आले असता कापून काढणाच्या डॉक्टरास कोणी दोष देत नाहीं. परोपकारासाठी औषध देणाच्या डॅक्टरास रोगी बरा न झाल्यास त्याचे दुःख होत नाहीं, हें याच तत्त्वाचे उदाहरण होय. पण त्याच डॉक्टराचा मुलगा आजारी पडला असता त्याची बुद्धि कशी गुग होते, हे पाहिले म्हणजे निष्काम किंवा फलाशारहित कर्म कशाला म्हणावें हें ध्यानात येईल. बुद्धि फलाशाराहत झाली म्हणजे कर्मच होणे शक्य नाही असे जे कित्येकाचे म्हणणे आहे, त्यात काही अर्थ नाही. ज्याची बुद्धि संसारांत गुंतली आहे, त्यास ही गोष्ट शक्य वाटत नाहीं; म्हणून ती नाहींच म्हणणे म्हणजे आंधळ्यास सूर्य दिसत नाहीं म्हणून तो नाहींच म्हणण्यासारखे आहे. बुद्धि अशा प्रकारची निष्काम झाली म्हणजे त्या मनुष्यास * पुष्कळ मनुष्यांच्या पुष्कळ कल्याणाकरिता-प्रयत्न कर ’ असा उपदेश करण्याची जरूरच राहत नाहीं. मनुष्य म्हटला म्हणजे तो आपल्या कृत्याच्या बाह्य परिणामाचा सारासार विचार करणारच, एरवीं तो मनुष्यच नव्हे. पण बाह्य परिणामाचा