पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/538

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीभगवद्गीतारहृस्य, ५२१ गीतेमध्यें निष्काम कर्मयोगच प्रतिपाद्य आहे, याबद्दल दुसरा पुरावा म्हटला म्हणजे चौथ्या अध्यायांत दिलेली गीताधर्माची परंपरा होय. भगवान्-विवस्वान -मनु- इक्ष्वाकु अशी ही परंपरा सागितली आहे. पातंजलयेोगांत ही परंपरा कोठेच दिलेली नाहीं. महाभारतात शातिपवीच्या अखेर नारायणीयोपाख्यानात नारायणीय किंवा भागवतधमाची सात कल्पातील जैो एक मोठी परंपरा दिली आहे, त्यातील हल्लींच्या महायुगातील त्रेतायुगाच्या परंपरेशीं मात्र गीतेची परपरा जुळते; व त्यावरून नारायणीय किंवा भागवतधर्म * योग ' या नावानें गर्तेित प्रतिपाद्य आहे, असें सिद्ध होतें. हा नारायणीय धर्म प्रवृत्तिपर असून शिवाय मोक्षप्रदही आहे, असें याच म्हणजे नारायणीयेोपाख्यानात पुढे वर्णन आहे. गीतेवरील टीकाकारानी गीताधमांच्या या परंपरेसबंधानें विचार केला असल्याचे मला आढळून आलें नाहीं. गीतेंतील उपदेशास साख्य व योग या दोन मागांपासून सुरवात झाली असून दोहोंपैकीं निष्काम कर्मयोगच श्रेष्ठ, असा निकाल झाल्यावर पुढे दुसरे काहीं प्रश्न साहजिकरीत्याच उपस्थित होतात; व त्याचे उत्तर पांचपासून सतराव्या अध्यायापर्यंत दिलेले असून गीतेतील शेवटल्या म्हणजे अठराव्या अध्यायात एकंदर सर्व विषयाचा उपसंहार केला आहे. गीतेंतील अठरा अध्यायांची अशा प्रकारें वाटणी न करिता कर्म, भक्ति व ज्ञान या तिहींना किवा तत्, त्वं, असि या ** तत्त्वमसि ' वाक्यातील तीन पदाना यथानुक्रम सहा सहा अध्याय वाटून देण्याची काहीं टीकाकाराची रीत आहे. पण माझ्या मतें ही रीत बरोबर नाही. कर्म, भक्ति व ज्ञान ही स्थूलमानाने तीनही गीतेंत प्रतिपाद्य असलीं, तरी एकेकाच्या वांटणीस बरोबर सहा सहा अध्यायच येतात असें नसून हे तीन विभाग स्वतंत्र म्हणजे परस्पर निरपेक्ष आहेत, असेंही मानता येत नाही. पण त्वं, तत् आणि आसि या तीन पदांचे निरूपण करणारे सहा सहा अध्याय आहेत असे म्हणणें याहून विचित्र आणि निराधार आहे. गीतेंतील नऊ, दहा, अकरा व बारा हे चार अध्याय भक्तिपर आहेत असे म्हणता येईल. पण जरा सूक्ष्म विचार केला तर असें दिसून येईल कीं या अध्यायातूनही ज्ञानाचा व विशेषतः कर्माचा धागा कायम ठेवला असून भक्तितत्त्वाचा उल्लेख मागे म्हणजे चौथ्या अध्यायांतच * श्रद्धावान लभते ज्ञानम् ’ या श्लोकात झालेला आहे. सारांश, वर सांगितलेली त्रिविध वाटणी सयुक्तिक नसून सहाव्या अध्यायांत पातंजलयोग आाणि पुढील अकरा अध्यायीत सामान्यत: भक्तियुक्त ज्ञानविज्ञान वर्णिले आहे, असे म्हणार्वे लागतें. हें ज्ञानविज्ञान का वर्णिलें ? स्वतंत्र म्हणून किंवा दुस-या काहीं कारणासाठीं ? याचा आता विचार केला पाहिजे. हा विचार करूं लागलें असतां असे आढळून येईल कीं, पातंजलयेोगाचे किंवा ज्ञानविज्ञानाचे हें निरूपण स्वतंत्न नाहीं. निष्काम कर्मयोगाची मातबरी कर्म