पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/521

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

* c 3 लो० टिळकांचे केसरींतील लेख. प्रवास करून बेहरिंगच्या सामुद्रधुनीच्याद्वारें आशियांत येऊन व कांहीं दिवस इजिप्तमध्यें राहून पॅलेस्टाईनमध्यें गेल्याचे वर्णन आहे ! मेक्सिकोमधील प्राचीन लोक मोठमोठया इमारती बाधण्याच्या कामीं जरी कुशल होते तरी देवतेस मनुष्याचा बळी देणे किंवा प्रसंगविशेषीं नरमांस भक्षण करणे या राक्षसी चाली त्यांच्यामध्यें प्रचलित होत्या व मोसेसचा देव जो जिहोवा (यव्ह) हाही याच वगीतला होता असे त्याच्या वर्णनावरून दिसते. यावरून आणि भाषासाम्यावरून यहुदी लोक हे मूळचे मेक्सिकोमधील प्राचीन मानव जातीच्या वर्गापैकीच असावे व त्यामुळेच मेक्सिकोमधील नव्हतील भाषेमधील जुन्या कथा आणि बायबलांतील कथा यामध्यॆ साम्य आहे असें आता कित्येकांचे म्हणणे आहे. हें म्हणणें साधार असे वा नसेो एवढी गोष्ट निर्विवाद आहे कीं, उत्तर अमेरिकेंत मेक्सिको प्रांतात फार प्राचीन काळीं नरमास खाणारे व नरमेध करणार, सूर्योपासक, शरिरार्ने मजबूत व उंच बांध्याचे बलाढ्य लोक राज्य करीत असून त्यानीं त्या वेळीं तेथे मोठमोठी शहरे बाधली होती. हे लोक खिस्ती शकापूर्वी तेथे होते, एवढे स्पष्ट आहे. पण खिस्ती शकापूर्वीचा पक्का काल समजत नाही. स्पेन देशातील लोक अमेरिकेंत गेले तेव्हा याच्याच जातीचे * अॅस्टेक ' नांवाचे लोक तेथें राज्य करीत होते. पण त्याच्या नरमेधाच्या रानटी चाली पाहून स्पेन देशातील योद्धा केोटेंस यास त्वेष आला आणि त्याने * अॅस्टेक ? लेोकाचा पूर्ण उच्छद करून त्याची शहरे, गावें व इमारती सर्व जमिनदोस्त केल्या आणि मेक्सिको देशात स्पेनच्या खिस्ती राज्याची स्थापना केली. हृल्ली मेक्सिको देश स्वतंत्र झाला आहे, तरी तेथील राज्य खिस्ती धर्माचेच आहे. वरील हकीकत आज सागण्याचे कारण असें कीं, रा. ब. चिंतामण विनायक वैद्य यानी नुकतेच * रामायणाचे गूढ ? म्हणून जें रामायणावर एक पुस्तक लिहिलें आहे त्यात याचा उपयोग केला आहे. रा. ब. वैद्य यानी महाभारतावर जे पुस्तक केलें आहे त्याचे परीक्षण मागे केसरीत आलेंच आहे. * रामायणाचे गूढ ? हैं सध्यांचे पुस्तक त्याच मासल्याचे आहे. याचे दोन भाग आहेत. एकांत रामायणाच्या ग्रंथरचनेचा विचार केला असून वाल्मिकीचे रामायण वेळोवेळी कसें वाढत गेले, व तुळशीदासापर्यंत त्यात अधिकाधिक अद्भुत गोष्टींचा संग्रह कसा होत गेला याचे विवेचन केले आहे. हें विवेचन मार्मिक आहे; आणि काहीं किरकोळ बाबतीत जरी मतभेद होणे शक्य असले तरी सामान्यतः रा. ब. वैद्य यांचा सिद्धांत सर्वमान्य होण्यास आमच्यामतें कांहीं हरकत नाही. मूळ वाल्मिकी रामायण महाभारताच्या पूर्वीचे असून त्यांत पुढे कालानें काहीं फेरफार झाले असावे व त्यामुळेच बुद्धाबद्दलचे लोक त्यांत आले असावे असें जें रा. ब. वैद्य यांचे म्हणणे आहे तें आमच्या मतें सयुक्तिक आहे. परंतु हल्लींच्या ग्रंथांत विशेष महत्त्वाचा भाग म्हणजे दुसरा होय. यांत सुरासुरांचा सुरेशीं म्हणजे दारूशीं जो संबंध दाखविला आहे तो पुराणात दिला असला तरी काल्पनिक आहे असें