पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/506

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महाराष्ट्र भाषेची वाढ. ?とや、 असें मनूनं प्रतिपादन केले आहे. असत्यवादीपणा कां व किती गह्य अथवा शिक्षाई आहे याचे यापेक्षा अधिक सयुक्तिक कारण देणें शक्य नाही. परंतु वरील लोकात भाषेच्या उपयुक्ततसेबंधाने ज विधान केले आहे तें आमच्या मर्ते आधक महत्त्वाचे आहे. पशूपासून मनुष्यजाती ओळखण्याची जी थोडींबहुत चिन्हें आहेत, त्यापैकींच भाषा हे एक प्रमुख लक्षण होय, असें बच्याच भापाकोविदाचे मत आहे; आणि मनुष्याचे आपापसातील व्यवहार जितके अधिकाधिक विस्तृत किंवा व्यापक होतात, त्या मानानें भाषेलाही साहज़िक अधिकाधिक विस्तृत स्वरूप प्राप्त होते. भाषा ही एक ईश्वरदत्त, किंवा डार्विनच्या मता प्रमाणे म्हटले तर उक्रातिरीत्या सिद्ध झालेली वरिष्ठ पायरीची देणगी होय, आणि एखादा विशिष्ट मानवसमाज ज्या मानाने सुधारलेला असेल त्या मानने त्या समाजाची भाषाही सुधारलेली किंवा वाढलेली असते. थोडक्यात सागावयाचे असल्यास एखाद्या विशिष्ट राष्ट्राच्या किंवा समाजाच्या परस्परव्यवहाराचे स्वरूप किंवा महत्त्व दाखविणारे त्या समाजाची भाषा हें एक यत्रच होय. मनूने सांगितल्याप्रमाणे सर्व व्यवहार भाषामूलक किंवा भाषच्या योगानें चालत असल्यामुळे एखाद्या भाषेच्या स्वरूपावरून भाषापंडित ती भाषा बोलणा-या समाजाच्या-विशेषकरून असे समाज किंवा राष्ट्र जेव्हा नष्ट झाली असतात तेव्हा त्याच्या-सुधारणेची अटकळ बाधितअततात. उघड आहे कीं, ज्या भाषेत भाववाचक नामे अधिक किंवा आत्मा आणि ईश्वर याच्या कल्पना दाखविणारे शब्द अधिक ती भाषा वापरणाच्या लोकाचे तात्त्विक विचारही त्या मानाने सुधारलेले असले पाहिजेत इतर बाबतीतही हाच न्याय लागू आहे. एखादू राष्ट्र किवा लोक नष्ट होऊन जरी हजारो वर्षे झाली असली तरी आम्हास जर ते लाक वापरीत असलेल्या भाषेतील शब्द समजतील तर या नष्ट झालेल्या राष्ट्राची प्रगती अथवा मुधारणा कोणत्या स्थिती भी होती याचे आम्हास ताबडतोब अनुमान करता येईल. साराश, समाजाचा व्यवहार, समाजाचे विचार, समाजाचा व्याप आणि समाजाची भाषा याच्यामधील संबध इतका निकट आणि नित्य आहे की, एकाचे प्रतिबिंब दुस-यात उमटल्या खेरीज कधीही रहात नाहीं. एकाची वृद्धि तर दुस-याची वृद्धि आणि एकाचा क्षय तर दुस-याचा क्षय हा सिद्धात अबाधित आहे. कोणत्याही भाषेची अभिवृद्धि किंवा =हास याचा विचार करताना वरील अबाधित सिद्धात लक्षात ठेवला पाहिजे. भाषची अभिवृद्धि करणे जर इष्ट असेल तर एखाद्या पंडिताने धात्वर्थापासून अनेक काल्पनिक शब्द निर्माण करून त्याचा कोश बनविल्याने कार्यसिद्धि व्हावयाची नाही एखाद्या कृपणाने काट्यावधि रुपये संग्रह करून पुरून ठेवल्यानें देशाच्या सपतीचीं जशी आभिवृद्धि होत नाहीं, त्याप्रमाणेच भाषेतील शब्दाचा प्रकार होय. अर्थशास्त्रातील विनिमयाचा व्यवहार सुरळीत चालण्यास किंवा वाढविण्यास ज्याप्रमाणे व जितकी नाण्याची जरूर लागते त्याप्रमाणे व तितकीच मनुष्यजातीच्या मनोवृत्ति व विचार परस्परास