पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/505

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

9くく लो० टिळकांचे केसरींतील लेख. आहे. राज्य कमावणे किंवा गमावणे हें शारीरिक बलाचे काम आहे; व इंग्रजांपूर्वी ज्या लोकानी म्हणजे मुसलमानानीं हिंदुस्थानावर स्वारी करून आपले राज्य येथे स्थापिलें त्याजवरही वेदाताने आपली छाप बसविली होती, आणि अशी छाप बसविली तेव्हाच अकबरासारखे बादशहा निपजले,ही गोष्ट इतिहासप्रसिद्ध आहे.इग्रजाच्या राज्यातहि असा प्रकार घडून येणे अशक्य नाही.आधिभौतिक शास्त्राच्या प्रगतीनें वेदांताची प्रमेये अधिकाधिक बळकट होत चालली आहेत;आणि पाश्चिमात्य राष्ट्र धर्मीचीं काही शास्त्रसिद्ध तत्त्व आपणास सोपडावी अशा उद्योगास लागले आहेत. अशा वेळी आमच्या वेदान्ती धमचिीं तत्त्वे **वेदान्त मिशन' काढून खिस्ती मिशन-या प्रमाणे जर सर्व जगास आम्हीं शिकविलीं तर प्राच्य व पाश्चिमात्य विचाराची सागड घालून देऊन सर्व जगाच्या विचाराचे पाऊल आम्ही पुढे टाकल्याचे श्रेय आपणास मिळेल; इतकेच नव्हे तर, त्याचबरोबर आमच्या देशाबद्दल व लोकाबद्दल पाश्चिमात्य लोकात सहानुभूती उत्पन्न होऊन त्यामुळे देशकार्यही सहजरीत्या घडून येईल, असा स्वामींचा उपदेश आहे, व त्याचे सर्वास असें सागणे आहे कीं, ही अमूल्य सधि दवडूं नका, आणि राजकीयदृष्टया आपले वैभव जरी गत असले तरी जगाच्या बुडाशी जी काहीं थोर व उदात्त तत्त्वें अहेित त्यांत x }* x × करण्याच्या अपूर्व अध्यात्मिक शक्तीबद्दल आमची जी पूर्वीपार ख्याती चालत आली आहे ती बुडवू नका; योगानें व वेदान्तानें बुद्धीला जी काहीं परिपक्वता यावयाची त्याचे खरे चीज यातच आहे, आणि सध्याच्या परिस्थितीत गृहस्थाचेच नव्हे तर वेदान्त्याचेही हेच कर्तव्य होय. ബങ്ങാത്ത

  • महाराष्ट्र भाषेची वाढ.

वाब्यर्था नियताः सर्वे वाङ्मूला वाङ्वनि:सृताः । तास्तु यस्स्तेनयेद्वाचं सवैस्तेयकरो हि स: ॥ 一开ā。 वरील लोकात खोटें बोलणारा किंवा खोटी साक्ष देणारा मनुष्य चोरापेक्षांही अधिक गुन्हेगार कसा ठरतेो याची मनूने जी उपपात दिली आहे त्यापेक्षा अधिक बलवत्तर उपपति दुस-या वाङ्मयातून क्वचितच सांपडेल. मनुष्यजातीचे व्यवहार चालण्यास वाणीखेरीज दुसरे साधन नाहीं, परस्परांची मनै अगर विचार परस्परास कळविण्यास भाषा हा एकच मार्ग आहे, आणि भाषेपासूनच किवा भषिच्यायोगे सर्व प्रकारचा व्यवहार उत्पन्न अगर सिद्ध होत असतो तेव्हा अशा पकारच्या सर्व व्यवहारसाधनाचा जो मनुष्य दुरुपयेोग करितो किंवा त्याशी प्रतारणा करितो तो एकपक्षी नव्हे तर सर्वस्वी चेोर ठरतो,

  • (केसरी, ता. २९ माहे मे १९०६ इसवीं, )