Jump to content

पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/496

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
बाणभट्ट आणि श्रीहर्ष.

४७९

वाणाने केलेल्या स्कंदगुप्ताच्या वर्णनांत 'निजनृप वंशदीर्घे नासावंद्यं दधानः या श्लोकांबद्दल (तो नीट न समजता ) जरी बाणाची थट्टा केली आहे तरी वाणाची वर्णन करण्याची शैली अपूर्व व जोरदार आहे ही गोष्ट त्यांनी कबूल केली आहे. अशा प्रकारच्या वश्यवाणी कविचक्रवर्तीच्या भाषेनें हिंदुस्थानचा इतिहास लिहिला गेला नाहीं दें आमचे दुर्दैव होय.
 वे. सं. पांडुरंग गोविंदशास्त्री पारखी याच्या हल्लींच्या निबंधावरून जे थोडेसे ऐतिहासिक विचार सुचले ते वर दाखल केले आहेत. आतां खुद्द निबंधा- संबंधाने एकदोन गोष्टीत असलेला मतभेद सरतेशेवटीं सागावयाचा तो सांगून हा लेख पुरा करितों, बाणभट्टाच्या नावावर मोडत असलेले पार्वतीपरिणय नाटक कुमारसंभवावरूनच घेतलेलें आहे, असें कै. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांप्रमाणें आमचेंही मत आहे. हैं नाटक बाणकवीच्या कवित्वास शोभत नाहीं, हे खरे आहे. पण श्रीहर्षाच्या दरबारांत लोकांच्या रंजनार्थ नागानंदासारखी नाटकें करीत असत तर तत्कालिन नाटकमंडळीच्या विनंतीवरून बाणाने कुमार- संभवाचेंच नाटक करून दिले असेल, असेही म्हणता येईल. हल्लींच्या काळांत राजाज्ञेवरून बाणाच्या कादंबरीचेही नाटक झालेले आहे, हे लक्षांत आणले म्हणजे पार्वतीपरिणयाची कल्पना आम्हांस काही असंभाव्य दिसत नाहीं. तसेच दालसाहेबानी रत्नावलीतील व श्रीहर्षचरित्रातील एका श्लोकाचें जें साम्य दाख- विले आहे तेंही आमच्या मतें बरोबर आहे. आता एके ठिकाणीं दैवाची अनु- कुलता व दुसऱ्या ठिकाणीं प्रतिकूलता वर्णिली आहे हे जरी खरी आहे तरी देवाच्या साधनविषयक कल्पनेचें आणि पद्यरचनेचे साम्य कायम राहतें ते राहतेंच, हर्षचरित हा ग्रंथ कदाचित् अपुरा राहिला असावा असें पाडुरंगशास्त्री म्हणतात; पण तसा प्रकार झाल्याचे आम्हांस आढळून येत नाही. हर्षचरिताची जी टीका आहे त्यावरूनही हल्लींचा ग्रंथ पूर्ण आहे असे दिसून येते. हर्ष व राजवर्धन या दोघा भावाचे राज्यश्रविर असलेले प्रेम, राज्यश्रीची दैवामुळे झालेली विपन्नावस्था, संकटसमयी श्रीहर्षाकडून तिची अकल्पित सुटका, इत्यादि आख्या- विकेस अवश्य लागणाऱ्या गोष्टीपलीकडे हर्षचरित लिहिण्याचा बाणाचा उद्देश होता असें दिसत नाहीं. नाहींपेक्षां हुएनछंग यानें लिहिल्याप्रमाणें दक्षिणत ज्यानें त्या वेळी साम्राज्य स्थापन करून श्रीहर्षास नर्मदा उतरूं दिली नाहीं त्या सत्याश्रय पुलकेशी राजाचाही हुएनछंगाप्रमाणे बाणाने उल्लेख केला असता. अथवा प्रयाग येथे दर पांच वर्षांनीं श्रीहर्ष आपली संपत्ति याग न करता लोकांस वांटी याचेही वर्णन या आख्यायिकेत आले असतें. कादंबरीच्या प्रस्तावनेत हर्षाचा उल्लेख नाहीं, गुप्ताचा आहे. यावरून गुप्तानी आश्रय दिलेले ब्राह्मण विद्वानांचे घराणें श्रीहर्षाच्या राज्यांत पुष्कळ दिवस त्याच्या आश्रयावांचून पण चांगल्या स्थितीत होते असे दिसून येते. हुएनलग याने असें लिहिले आहे कीं,
 ६०