पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/485

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

9aく लो० टिळकांचे केसरींतील लेख. वरील पद्धतीनें पांडवाचा काल खिस्ती शकापूर्वी सुमारे १५०० वर्षे येतो, मद्रासचे प्रोफेसर रंगाचार्य आणि कै. शंकर बाळकृष्ण दीक्षित हाच काल ग्राह्य धरतात. मि. आय्यर यात २००॥३०० वर्षे कमी करून भारतीय युद्ध खिस्ती शकापूर्वी १ १९४ किंवा सामान्यपणें बोलावयाचे झाल्यास १२०० वर्षे झालें असे म्हणतात. कसेंही असेा; हल्लींच्या कालगणन पद्धतीवरून पाहिले तर भारतीय युद्धाचा काल खिस्ती शकापूर्वी १२०० पासून १५०० वर्षे येतो. या पलीकडे जाऊं शकत नाहीं; व हा काल सेोडून देऊन ज्योतिषांचा कलियुगारंभकाल हाच पांडवाचा काल असे मानण्यास रा. ब. वैद्य यानीं जी प्रमाणे दिली आहेत तीं आमच्या मत बरोबर नाहीत. येथपर्यंत रा, ब. चिंतामणराव वैद्य याच्या ग्रंथाच्या पूर्वीधौतील कांहीं महत्त्वाच्या प्रश्नाचा व विशेषकरून त्यांतील वादग्रस्त प्रश्नाचा विचार झाला. आता पुढील लेखात त्याच्या ग्रंथातील इतर कांहीं मुद्याचे विवेचन करून या विषयावरील आमची लेखमाला आम्ही पुरी करणार आहों. _ _

  • महाभारत

नंबर ८ (मागील अंकावरून समाप्त ). या विषयावर आजपर्यंत जे लेख आले त्यात मद्दाभारतीय युद्ध केव्हां झालें, युद्धांतील पुरुष काल्पनिक आहेत की ऐतिहासिक आहेत, युद्धाचा इतिहास केव्हां, कोणी व कसा लिहिला, त्यात वेळोवेळीं भर पडली की काय, आणि असल्यास ती कसकशी पडत गेली वगैरे मुद्दश्यासंबंधानें रा. ब. चिंतामणराव वैद्य याचे सिद्धांत देऊन त्यांत आमच्या दृष्टीनें जें कांहीं उणेपुरे दिसले त्याचे विवेचन केले आहे. परंतु हें विवेचन वाचताना वाचकांनीं एवढे लक्षात ठेविले पाहिजे कीं, महाभारत ग्रंथाची योग्यता व महत्त्व, तें कधीं झाले व केव्हां झाले, या प्रश्नाचे निर्णयावर अवलंबून नाहीं. सामान्यत: एवढी गोष्ट निर्विवाद आहे कीं, जीजस खाइस्ट जन्मास येण्यापूर्वी काहीं शतकें-निदान तत्पूर्वी तीन चार शतकें-या ग्रंथाचे स्वरूप हल्लीं उपलब्ध आहे त्याचप्रमाणे होतें. खिस्तानंतर पांचव्या शतकांतील शिला-- लेखांत एक लक्षात्मक भारताचा उल्लेख आहे; आणि जावाजवळील बली बेटात याच सुमारास या ग्रंथाचे बली बेटातील भाषेत भाषातर झाले आहे. मेग्यास्थिनीसच्या वेळीं बहुधा हल्लींचेच भारत प्रचारांत असावे, असें मागे आम्हीं दाखविलेंच आहे. अर्थात् कमीत कमी निदान २५०० वर्षे तरी हिंदुस्थानांतील हिंदुलोकॉस हा ग्रंथ प्रिय होऊन व्यासानीं म्हटल्याप्रमाणे भारतधर्म पाळणाच्या

  • (केसरी, ता. ३० मे १९०५).