पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/472

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महाभारतं. 년, ६०४२ वर्षाचा काल गेला असे मानतात. तसेच मथुरेमध्ये शैौरसेन लोकांनीं पूज्य मानलेला हिरॉक्लिस हा डायोनिसँसपासून १५ वा पुरुष होता. असें आपणस माहीत असल्याचे मेग्यास्थिनीस यानें लिहिले आहे. या दोन वाक्यावर रा. वैद्य यानी बरीच टोलेजंग इमारत उभारली आहे. हिरॉक्लिस म्हणजे हक्यूंलस हा ग्रीक लोकांच्या पुराणांत पहिला मोठा दैवी योद्धा कल्पिला आहे. पण मथुरेचा आणि शौरसेन लोकांचा त्याच्याशीं मेग्यास्थिनीसनें जो संबध जोडला आहे त्यावरून वरील वाक्यांत हिरॉक्लिस या शब्दानें हरी किंवा श्रीकृष्णच अभिप्रेत असावा असें रा. वैद्य यांचे म्हणणें आहे व तें काहीं गैरवाजवी दिसत नाहीं. आतां डायोनिसेंसिपासून १५ वा श्रीकृष्ण आणि डायोनिसेसिपासून १५३ वा चंद्रगुप्त. तेव्हां अर्थातच श्रीकृष्णापासून चंद्रगुप्तापर्यंत १५३-१५=१३८ पिढ्या झाल्या. चेद्रगुप्ताचा काल ग्रीक इतिहासाने निश्चित झाला असून तो खि. स. पूर्वी ३१२ वर्षे धरण्यांत येतो. याच्यापूर्वी १३८ पिढ्या श्रीकृष्ण; म्हणजे दर पिढीस सुमारें २० वर्षे धरिली तरी १३८×२०=२७६० इतकीं वर्षे चद्रगुप्ताच्यापूर्वी श्रीकृष्ण झाला असें निष्पन्न होतें. सारांश, चेद्रगुप्ताचा काल खि. स. पूर्वी ३१२ वर्षे धरिला तर श्रीकृष्णाचा काल खि. स. पूर्वी ३१२+ २७६० = ३०७२ वर्षे येतो आणि तो कलिकालाच्या आरभाच्या जवळ येतो म्हणून ग्राह्य आहे असें रा. ब. वैद्य यांनीं प्रतिपादन केलें आहे. ही कोटी रा. वैद्य यानीं प्रथमच काढली असून नवीन आहे हें वर सागितलेच आहे. आमच्या मतें हा कोटिक्रम चुकीचा आहे. मेग्यास्थिनीस यानें १५३ पिढ्यांस ६०४२ वर्षे लागलीं असे लिहिले आहे म्हणजे सरासरीनें दर पिढीस सुमारें ४० वर्षे पडतात; आणि ४० वर्षाची एक पिढी या मानानें १३८ पिढ्या धरल्या म्हणजे श्रीकृष्णास चेद्रगुप्तापूर्वी १३८×४० = ५५२० वर्षे मार्गे घालावें लागतें. अशा रीतीनें गणित केले म्हणजे श्रीकृष्णाचा काल खि० पू० ३१२ + ५५२० = ५८३२ वर्षे येतो. म्हणजे कलियुगाच्या आरंभापूर्वी सुमारै २८०० वर्षे श्रीकृष्ण किंवा पांडव झाले असें मानार्वे लागतें. रा. वैद्यांनीं दर पिढीस सुमारें २० वर्षे धरून हा विरोध टाळला आहे. पण त्यामुळे दुसरा एक निराळाच विरोध उत्पन्न होते, हें त्याच्या लक्षांत आले नाहीं असे वाटतें. कारण वीस वीस वर्षाच्या १३८ पिढ्या मोजल्या म्हणजे त्या सोडून डायोनिसॉसपासून श्रीकृष्णापर्यंत १५ पिढ्यांस ६०४२ - २७६० = ३२८२ वर्षे धरावीं लागतात. अर्थात् अशा रीतीनें या १५ पिढयांतील प्रत्येक पुरुष २०० किंवा २२५ वर्षे राज्य करीत होते असें मानार्वे लागतें ! या विरोधाचे समाधान कसे करावयाचे, ई आम्हांस समजत नाहीं. डायोनिसँॉसपासून श्रीकृष्णापर्यंत १५ पिढया दीर्घायु (दर एक २०० वर्षाची) आणि श्रीकृष्णानंतर कलिकालास सुरवात झाल्यामुळे पुढील १३८ पिढया अल्पायु ( दर ५७