पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/461

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

છે છે ૬ लो० टिळकांचे केसरींतील लेख. कसा करावा याचाही अशा प्रकारच्या महाकाव्यापासून राष्ट्रांतील लेोकांस बोध होते. आर्षकाव्य इतिहासप्रधान असावें, केवळ काल्पनिक नकेा असें लक्षण करण्याचा हेतुही हाच होय. साधारण महाकाव्यांत हा गुण नसते; व म्हणूनच आर्ष-महाकाव्याचे लक्षण पुरं होण्यास आमच्या मते अशा प्रकारच्या काव्याचा जेो हा महत्त्वाचा शिक्षणात्मक भाग आहे, त्याचा सदर लक्षणात अवश्य समावेश झाला पाहिजे. काव्यांतील वृतें किंवा वृत्त कानास गोड लागणारे आणि रसास अनुकूल असार्वे, याचाही जर * एपिक ' काव्याचे लक्षणात आनॉल्डसाहेबांनी उल्लेख केला आहे तर सदर काव्य सूक्ष्मार्थन्यायाने युक्त, संसारांतील अनेक प्रसंगाचे द्योतक आणि पावन लोकयात्राक्रमाचे प्रतिपादक असावें या गोष्टींचाही त्यात का समावश होऊ नये हे आम्हास समजत नाही. पाश्चिमात्य आर्षमहाकाव्यांत हे गुण पूर्णपणे नसले तर त्यामुळे महाभारताची योग्यता कमी न होतां अधिक वाढते, हे आम्हीं लक्षात ठेवले पाहिजे. हें आर्ष महाकाव्याचे लक्षण झालें, महाभारतास हे लक्षण पूर्णपणें लागू पडतें हें आम्ही सागावयास नकोच; कारण व्यासांच्याच शब्दांनीं हैं लक्षण आम्हीं बोधले आहे. तथापि आनॉल्डसाहेबांच्या इंग्रजीलक्षणाप्रमाणें भारतात * एपिक ? काव्याचे सर्व गुण आहेत, असे जे रा. वैद्य यानीं प्रतिपादन केले आहे त्यासंबधान दोन शब्द लिहिणें जरूर आहे. आमच्यामतें रा. वैद्याचे हें प्रतिपादन उत्तम साधले असून सर्वानी तें एकवार वाचण्यासारखे आहे. सुमारे दोन वर्षापूर्वी रा. ब. वैद्य यानीं पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेत जें व्याख्यान दिले होते, त्याचा हाच विषय असून त्याचा साराशही त्या वेळीं केसरीत प्रसिद्ध झाला होता. आर्नेोल्डसाहब म्हणतात कीं, आर्षमहाकाव्याच्या कथानकातील गोष्ट महत्त्वाची, गहन आणि एकार्थसगत असली पाहिजे भारतीय युद्ध, कीं ज्यांत हिंदुस्थानातील त्या वेळच्पा बहुतक राजानी केोणत्या तरी पक्षास मिळून आपली करामत दारवविली, त्यापेक्षा अधिक महार्थक व काव्योपजीवि विषय दुसरा कोणता सापडणार ? * अनाश्रित्येदमाख्यानं कथा भुवि न विद्यते ? असे जें सीतिनें या महाकाव्याच्या कथानकाबद्दल म्हटले आहे, तें अगदीं यथार्थ आहे. प्रधान पुरुषाच्या शीलवैचित्र्याबद्दल तर महाभारताचे हात धरणारे दुसरें काव्य क्वचितच सांपडेल. युधिष्ठिर, भीम, अर्जुन, कृष्ण, द्रौपदी, द्रोण, भीष्म याच्या स्वभावाची व गुणाचीं चित्र इतकीं सुरेख वठलीं आहेत कीं, हीं पात्रे महाभारत वाचणाया किंवा श्रवण करणाच्यांच्या डोळ्यापुढे मूर्तिमंत उभी राहातात. महाकाव्यातील प्रतिनायक किंवा त्याचे साथीदार मुख्य नायकाहून कमी दर्जाचे असले तरी एकंदरीत त्याच्या तोडीचेच असल्याखेरीज काव्यांतील कथानकास जितकें उदात्त रूप यावें तितकें येत नाहीं, असा साहित्यशास्राचा सिध्दान्त आहे. मिल्टनच्या * पाराडाईज लॉस्ट ' काव्यांत सैतान हा ईश्वराचा प्रतिस्पर्धी खरा, पण त्याचे तोंडीं * स्वर्गात दास्यत्व करण्यापेक्षा