पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/453

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

9 く लो० टिळकांचे केसरींतील लेख. हल्लीं जी भारताची प्रत उपलब्ध आहे ती वैशंपायनाची प्रत आहे. तथापि, वैशंपायनाने जनमेजयास जे भारत सांगितलें ते तसेच आज आमच्या हातांत आहे कीं नाहीं याची शंका आहे. कारण हल्लीचे भारत लेोमहर्षणाचा पुत्र उग्रश्रव सौति पुराणिक याने शैौनकास सांगितले अस ग्रंथाच्या आरंभीच म्हटल आहे. वैशंपायनाने जनमेयास जी गोष्ट सागितली तीच अक्षरशः सौतीने शौनकास सांगितली असावी असे वाटत नाहीं. कारण एक तर त्या वेळीं हा ग्रंथ समग्र लिहिला गेला नसावा; आणि दुसरें असें कीं, हल्लीच्या महाभारताच्या प्रतीत चिंतामणराव म्हणतात त्याप्रमाणें पुष्कळ प्रश्न असे आहेत की, ते सौति व शैौनक यांच्या दरम्यानच लागू पडतात. अर्थात् जनमेजयाचे ते प्रश्न वैशंपायनास विचारण्याचा संभव नाही. अशाच दृष्टीनें जरा जास्त विचार केला असता असें आढळून येतें कीं, वैशंपायन व जनमेजय यांच्या दरम्यानचे काहीं प्रश्नही जनमेजयाच्या वेळींच नवीन उपास्थित झाले असावत आणि व्यासान वैशेपायनास सागितलेल्या मूळ भारतांत त्यांचा समावश झालेला नसावा. ही परंपरा लक्षात आणली म्हणजे (सुमंतु, जैमिनी यांचीं भारतें सोडून दिलीं तरी ) हल्लीं उपलब्ध असललें महाभारत व्यास, वैशंपायन आणि सौति या तिघांच्या कृतीचे असावे असे मानणें भाग येते. सौतीच्या भारताचीं पर्वे अठरा आहेत, पण इा सर्वोचा विभाग एकदा निराळा असून भारताच्या अनुक्रमणिकेंत शंभर पर्वे होतीं असें स्पष्ट सांगितले आहे. तसेच आदिपर्वाच्या पहिल्या अध्यायात (*ठाक १०१ ॥ १०२) चतुरविशति साह्स्री वक्रे भारतसंह्रिताम् । उपाख्यानर्विना तावद्भारतं प्रेोच्यते बुधैः ॥ ततोऽध्यर्ध शात भूयः संक्षेपं कृतवानृषिः । अनुक्रमणिकाध्याय वृत्तान्ताना सपर्वणाम् ॥ असा उल्लेख आहे. त्यावरून एक ग्रंथाचे चोवीसहजार व अनुक्रमणिकेचे दीडशे छेक एवढाच मूलग्रंथ असून तो उपाख्याना विरहित असल्यामुळे त्यास नुसर्त भारत म्हणत असे दिसून येतें. याच प्रकरणात पुढे विस्तृत भारताचे वर्णन असून त्याचे तीस लाख देवलोकीं, पंधरा लाख पितृलोकीं, चवदा गंधर्वलोकीं व एकलक्ष मनुष्य लोकांत उपलब्ध आहे. असें म्हटले आहे. पैकीं एक लाख * मयेोक्त वै निबोधत ’ असे सौतीनें म्हटले आहे. यावरून चोवीस हजाराचे भारत वाढवून सौतीनें एक लक्ष भारत केले असे रा. ब. वैद्य यांचे अनुमान आहे. पण हे अनुमान आम्हांस बरोबर दिसत नाहीं. वैशपायनाचे भारतच जवळ जवळ एक लक्ष असावें असें इतर पर्वांतील उल्लेखांवरून दिसून येते. सौतीनें त्यात कांहीं फेरफार केले आहेत हें उघड आहे. पण भारतास महामारताचे रूप सौतीच्या पूर्वीच प्राप्त झाले असले पाहिजे; एरव्हीं महाभारत या शब्दाची सरळ व्युत्पात सोडून ‘ महत्वाद् भारवत्वाच्च ’ अशी वेडीवांकडी