पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/396

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

इंग्रजी शिकलेल्यांचा एकांगीपणा. ३८१ यांच्या अांगांत मुळींच नाहीं. इतकेंच नव्हे तर धर्माकरितां हे मुळींच काळजी करीत नाहीत. याचे ढळढळीत उदाहरण पाहाणे असल्यास फार लांब जावयास नको. मिशनरी लोकांनीं जागोजाग खिस्ती संस्था स्थापन करून हिंदुलोकांस खिस्ताच्या कळपांत ओढण्यासाठीं ते जारीनें प्रयत्न करीत आहेत; व दुष्काळ हा आम्हांस साहाय्य करण्याकरितांच आकाशांतील बापार्ने हिंदुस्थानात पाठविला, असेंही सर्वानीं कृतीनें व कांहींनीं कंठरवानें जगास जाहीर केले आहे. ही स्थिती हिंदुधर्माच्या दृष्टीनें शोचनीय होय. याबद्दल कांही मतभेद असेल, असें आम्हांस वाटत नाहीं. पण विधवाविवाहाकरितां जितकी ओरड होते तितकी ओरडही ह्या बाबतीत होत नाहीं, मग उद्योग कोठला ? उलट सर्व देश खिस्ती झाला तर बरेंच झालें, असे मानणारे हल्लींच्या सुधारकवर्गाच्या पुढायांत कांहीं लोक आहेत. अशा लोकांनीं सामाजिक सुधारणेबद्दल केलेली ओरड लोकांस ग्राह्य न झाल्यास त्यांत लोकांचा तरी काय दोष ? सुधारणा करणें ती धर्माच्या पायावर करा, असें आम्ही कां म्हणती याचे कारण यावरून दिसून येईल. दहापांच युरोपियन लोकांनी एकत्र जमून आमच्या सामाजिक रीतीभाताची चची केली किंवा दहापांच हिंदूंनी एकत्र जमून युरोपियन लोकांच्या सामाजिक सुधारणेची जर चर्चा केली तर ती अनुक्रमे हिंदूस किंवा युरोपियन लोकांस जितकी ग्राह्य वाटेल तितकीच प्रस्तुतच्या सुधारकांची सामाजिक चर्चा हिंदुसमाजास मान्य होईल, अस म्हणण्यास काही हरकत नाहीं. ह सुधारक जन्मतः व वरपांगी हिंदु आहेत खरें, पण विचारानें आणि शिक्षणाने हे धर्मदृष्टया बहुतेक परकीयच बनल आहेत, असें लोक समजतात, आणि लोकांचा हा समज पुष्कळ अशीं साधार आणि खराही आहे. अशा स्थितींत समाजाची सुधारणा होणें शक्य नाहीं; इतकेंच नव्हे तर झाली तर तीही अनिष्टकारकच होईल हें लक्षांत ठेविले पाहिजे. हिंदुस्थानांत हल्लींच्या काळीं तीन चार धर्म प्रचलित आहेत, म्हणून हिंदुधर्मास राष्ट्रीयत्व नाहीं हैं म्हणणें चुकीचे आहे. केवळ लोकसंख्येच्या मानार्ने पहिले तरीही हिंदूंचाच समुदाय मोठा आहे; व एवढा मोठा समुदाय ज्या बंधनानें एकत्र झाला आहे तें हिंदुत्व हेंच होय. हें बंधन मोडून टाकणें किंवा त्याची उपक्षा करून दृढ न राखणें म्हणजे हिंदुस्थानांतील दोनतृतीयांश प्रजा वाळूच्या कणांप्रमाणें सैरावैरा मोकळी सोडर्ण होय. अशा रीतीनें हिंदुत्व मोडल्यानें राष्ट्रीय दृष्टया पुढे चांगले परिणाम होतील, असें जर कोणास वाटत असेल तर तो निवळ भ्रम आहे. हिंदुस्थानांतील तीस कोटि प्रजस एकत्र करण्यास हिंदुत्वाखेरीज दुसरीही कांहीं साधनें पाहिलीं पाहिजत, हें खरै आहे. पण त्याच्याबरोबर हेंही लक्षांत ठेविलें पाहिजे कीं, तीस कोटिपैकीं वीस कोटि प्रजा हिंदुत्वानें एकत्र झालेली आहे व त्यांचे बंधन कायम ठेवणें हेंच राष्ट्रीय दृष्टया अधिक सोईचे, शक्य आणि जरूर आहे. सारांश,