पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/393

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ই ৩৫ लो० टिळकांचे केसरींतील लेख नाहीं. दिवाणसाहेब सर कृष्णमूर्ति यांनी त्यांच्या केलेल्या कानउघाडणीवरून व पंडिताबाईंच्या पाघळलेल्या पांडित्याचे श्रेोत्यांनी ‘ हुर्यो 'च्या द्वारानें केलेल्या स्वागतावरून त्यांच्या या पवित्र कामास फार अडचणी येतील असे दिसतें. शिवाय हिंदु कुटुंबांतील * पडद्यावर ’ १ लक्ष तरुण स्त्रियांचा तांडा सोडून देण्याचा आपला हा बेत त्यांनीं भरसभंत सांगितल्याप्रमाणें मेंढीचे कातडें पांघरून येणा-या या मायावी वाघिणीस म्हैसुरांतील लोक * पडद्या ’ चे अांत घुसूं देतील किंवा नाहीं, याचीही वानवाच आहे. पंडिताबाईंच्या वरील बाष्कळ कोटिक्रमावर उत्तर देतां येणार नाही असे नाही. त्यांच्या ज्या * विचारी मना 'स हिंदु पुराणांतील सप्तसमुद्र व पंचगव्य-प्रायश्वित्त दिसलें त्यांच्या आटेक्यांतून निसटून गेलेल्या बायबलांतील पोरकट अशा कथा, मतें, तत्त्वज्ञान, जगदुत्पत्ति, वगैरे भाग कोणासही दाखवितां येतील. पण एवढा खटाटेोप करण्याची आम्हांस जरूर दिसत नाहीं; कारण ज्या मनास पंचगठय थोताड वाटतें पण बातिस्मोदक पवित्र वाटतें तें * विचारी ? म्हणण्यापेक्षां आंधळे किंवा दुराग्रहीच म्हटलें पाहिजे. रमाबाईस हिंदूंचे कांहींच आवडत नाही हें उघड आहे; व त्यांनीं आतां सर्वस्वीं हिंदुत्वावर पाणी सोडलेंच आहे. तर त्यांस आमची शेवटची एकच सूचना आहे कीं, हिदुत्वाचा जो एक कलंक त्यांच्या नांवाचे मार्गे * पंडेिता ’ पदवीरूपानें लागला आहे तो नाहींसा करून तेथे त्यांनीं * रेव्हरंडा ’ हें पवित्र उपपद धारण करावें.

  • इंग्रजी शिकलेल्यांचा एकांगीपणा.

गेल्या खेपेस हिंदुत्व राखून किंवा हिंदुत्वाचा पाया ठेवून सामाजिक सुधारणा करावयाची म्हणजे काय याचा अर्थ काहीं उदाहरणें देऊन आम्हीं सांगितला आहे. या उदाहरणापैकी सर्वच आम्हांस ग्राह्य आहेत अशी जर त्यावरून कोणाची समजूत झाली असेल तर ती अगदीं चुकीची आहे. व्यवहार दृष्टया इष्ट हेतु एक असतांही तो साधण्यास धर्मदृष्टया निरनिराळ्या रीतीचे उपाय असणें शक्य आहे एवढे दाखविण्याकरितांच तीं उदाहरणें घेतलेली होतीं व तेवढयापुरतीं तीं समपंक आहेत असे कोणासही कळून येईल. कित्येकांस हिंदुधर्मात पुढे झालेली अहिंसेची सुधारणा बरी वाटणार नाही तर कित्येकांस आर्यसमाजाचीही दिशा आवडणार नाहीं; पण त्यामुळे आम्हीं दिलेल्या इष्टान्ताचे महत्त्व कमी होत नाहीं. आमचा समाज पुरातन असून तो पूर्वापार चालत आलेल्या कांहीं नियमांनीं बद्ध झालेला आहे. हे सर्व नियम एकाच कालीं अस्तित्वांत आले आहेत असें नाहीं, तर देशकालानुरूप त्यांत फेरफार होऊन त्यांस हल्लींचे स्वरूप प्राप्त झाले आहे हें प्रस्तुतचे स्वरूप

  • (केसरी ता. १९-१-१९०४)