पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/392

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पंडिताबाईंचे पांडित्य. રે૭૭ एका रात्रींत पावला तो एका दिवसांत सगळ्या हिंदुस्थानास खिस्ती धर्मानुयायी कां करून टाकीत नाहीं ? अशा अर्थाचा पंडितेस एका हिंदूनें प्रश्न विचारला होता; तेव्हां त्यांनी असे करणे ईश्वरास शक्य आहे, पण तो तसें कां करीत नाहीं त्याचे मनांत काय आहे हैं मीं कसे सांगूं ? असे उत्तर दिले ! पुन: प्रभू येशु जेव्हां त्यांस दर्शन देईल तेव्हां त्यांनीं त्याजपासून या कोड्याचा उलगडा करून ध्यावा, अशी आमची पंडिताबाईस सूचना आहे. आपलें चुटपुटतें संस्कृत भाषेचे ज्ञान व * विचारी मन ’ याच्या रासायनिक संगमापासून कोणतीं अमृततुल्य फळे निर्माण झालीं याचे याप्रमाणे वर्णन करून पंडिताबाईंनी आपल्या * कामगिरी 'चे कथन केलें. आपण स्वत: विधवा असल्यामुळे विधवाचे दु:ख पाहून आपलें अतःकरण कळवळतें. शारदासदनांतील पुष्कळ विधवांनीं जातिभेद झुगारून दिला आहे; कांहीं अजून जातिधर्माप्रमाणे वागत आहेत; त्यांना तेथे लिबरल एज्युकेशन ऊर्फ उदार शिक्षण दिले जातें, व वाचनासाठीं अगदीं निवडक व उत्तम बुकें मात्र देण्यात येतात. * पवित्र शास्रा ’चे तर नेहमीं वाचन होतें. बायबल हें वाचनास फारच उत्तम पुस्तक आहे. बडे मुत्सद्दी व विद्वान् पुरुष जे जे झाले ते केवळ बायबलामुळे तसे झालेले असतात. * माझ्या नीतिधैर्याची इमारत बायबलचे पायावर उभारलेली आहे. ’ असें कै. न्या. रानडे यांनी आपलें गुज पंडिताबाईपाशीं सांगितले ! तसेंच न्या. चंदावरकर जज्ज ह्यांनीं बायबलचे चांगलें अध्ययन केले आहे; * आज ते जसे झाले आहेत तसे बायबलनें त्यांस केले आहे ? असें पंडिताबाईंनी आपल्या श्रेोत्यांस सांगितलें ! सर्व हिंदुस्थान एका दिवसांत नसले तरी थोड्या वर्षातच खिस्ती करून टाकतां येईल अशी पंडिताबाईस खात्री वाटत आहेसे दिसतें; आणि हें पवित्न काम तडीस नेण्यासाठी त्यांनीं युक्तिही शोधून काढली आहे. हिंदुस्थानांत ५ लक्ष युरोपियन व युरेजियन तरुण स्रिया अशा आहेत कीं, त्यांस हें पवित्र कृत्य करून हिंदु स्त्रियांची उन्नति सहज करितां येईल. या ५ लक्षांपैकीं नुसत्या १ लक्ष स्त्रियांनीं बाहेर पडून अनुभविक माणसाचे देखरेखीखालीं ही मोहीम सुरू करावी; त्यांस लोकांची भाषा, चालीरीति व संवयी यांचे पूर्ण ज्ञानही आयतें आहेच; त्याच्या साह्यानें त्यांनी हिंदु कुटुंबांतील पडद्याचे मार्गे प्रवेश करावा; आणि तेथे सर्व जगापासून दूर राहिलेल्या स्रियांस आधी मैत्रिणी, मग सोबतिणी व शेवटीं खिस्तीणी करून टाकावें म्हणजे झाले ! अशी पंडिताबाईची अजब युक्ति आहे; व तशाच कांहींशा इराद्यानें त्या मैसूरांत गेल्या आहेत. म्हैसूरच्या खानेसुमारीच्या रिपेोटीवरून कीं काय जाणें, पंडिताबाईनीं असें गणित केले आहे कीं म्हैसूर संस्थानांत हजारौ विधवा असून त्यांपैकी ४००० तर निव्वळ अर्भकें आहेत, व तीं प्रभु येशूचे कळपांत शोभतील अशीं कॅौवळीं केंौकरें आहेत. परंतु त्यांचा हेतु कितपत तडीस जाईल हें सांगतां येत Y Q