पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/385

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ইও e लो० टेिळकांचे केसरींतील लेख. स्थितीतल्या गृहस्थास आमच्या इकडील लोकांनीं तरी ज्ञातींत काय म्हणून घ्यावें ? मनुष्य स्वभाव हा येथून तेथून सारखा आहे. इंग्रज लोक ज्याप्रमाणे कोठेही गेले तरी आपला अभिमान ठेवून इंग्रजासारखेच राहातात, तसा तुम्ही हिंदुत्वाचा आभिमान कायम व जागृत ठेवा, आणि मग हे सामाजिक प्रश्न लोकांपुढे मांडा असें प्रोफेसर रंगाचार्य यांचे म्हणणे आहे. ज्यास हिंदुधर्माचा किंवा हिंदुत्वाचा अभिमान नाहीं त्यास हिंदु लोकांनी काय समाजसुधारणा करावी हें सांगण्याचाही पण अधिकार नाहीं. हिंदुधर्मावर श्रद्धा नाहीं, प्रार्थनासमाजाच्या पीठावर उभे राहून शंकराचार्यास शिव्या देण्यास तयार, स्वतःच्याबुद्धीनें खरा वाटेल तो धर्म, बाकी सर्व झूट, अशी किंवा अशाच प्रकारचीं दुसरी ज्यांची मर्त आहेत त्यांनी हिंदुधर्मात किंवा हिंदुसमाजाच्या चालिरीतींत ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न न करितां समाजाबाहेर राहून इतो भ्रष्टस्ततो भ्रष्ट: या स्वानंदस्थितीच्या सुखाचा अनुभव घेत बसार्वे हेंच चांगलें. पन्नास वर्षापूर्वी जे समाजसुधारक बनले त्यांस त्यावेळी हिंदुधर्माची अगर त्यांतील ग्रंथांची माहिती नव्हती व त्यामुळे सुधारणेची भलतीच दिशा त्यांनीं पतकरलेली होती; पण संस्कृत ज्ञानाच्या प्रसारानें आणि थिऑसाफिकल सोसायटीच्या उद्योगानें हिंदुधर्म, हिंदुआचार, हिंदुतत्त्वज्ञान यासंबंधानें लोकांस उत्तरोत्तर जास्त माहिती मिळून पूर्वीचे विचार आतां पालटत चालले आहेत; आणि पुष्कळ सुशाक्षत लोकांस असे वाटू लागले आहे की, हिंदुत्वाचा पाया जर आम्ही सोडून दिला तर आम्हांस आमचे असें कांहींच राहणार नाहीं. नव्या परिस्थितीला अनुरूप सामाजिक फेरफार कोणास नको आहेत असें नाहीं. पण जे फेरफार व्हावयाचे त्यामुळे हिंदुत्वाचा अभिमान नष्ट होऊं नये अशी प्रत्येकानें खबरदारी घेतली पाहिजे. ही खबरदारी सामाजिक परिषर्दत घेतली जात नाहीं, किंबहुना ती या सुधारकवगीस नको आहे हें उघड आहे; व याच मतभेदामुळे मद्रासस हिंदु असोसिएशन ही नवी सभा यंदा स्थापन झाली आहे. मुंबई इलाख्यांत सामाजिक परिषदेच्या कामास जें कांहीं आजपर्यंत प्रतिकूल मत झालेले आहे तें एवढयाचकरितां आहे व केव्हांना केव्हां तरी मद्रासेस यंदा झाला तसा प्रकार व्हावयाचाच होता. याकरितां मद्रासस जी नवी सभा स्थापन झाली आहे तिचे आम्ही आभिनंदन करितीं. हल्लीच्या कालीं हिंदुधमीबद्दल ब-याच सुशिक्षित लोकांत जी आस्था आढळून येते त्यावरून आम्हांस अशी उमेद आहे कीं, या नव्या सभेच्या तत्त्वांचाच अखेरीस जय होईल. कोणतीही सामाजिक सुधारणा झाली तरी ती स्वीकारतांना आम्ही आपले मूळ काय हें विसरतां कामा नये; आणि तसे होईल तरच आमचे राष्ट्रीयत्व कायम राहून आम्ही प्रगतीच्या मार्गास लागूं. सामाजिक सुधारणा राष्ट्रीयत्वास धरून पाहिजे असें जें आमचे म्हणणें आहे त्याचा अर्थ काय हें यावरून व्यक्त होईल. न्या. चंदावरकर यांनीं राष्ट्रीय सामाजिक सुधारणा म्हणजे काय हें आपणास कळत नाही असे म्हणून त्या