पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/380

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हर्बर्ट स्पेन्सर. ३६५ होते इत्यादिक मर्त * मूले कुठारः ’ या न्यायानें उध्वस्त होतात. अर्थात् परलोक आदिकरून धर्मकल्पनांचे मूळ कुंठित होतें हें सांगावयास नकोच. देहामध्ये उत्क्रांतीतत्त्वाप्रमाणें एका विशिष्ट प्रकारच्या पूर्णतेस पेोहोचलेली जीवरूप जी शक्ति तिचा देहास मरण आले असतां एकदम नाश व्हावा आणि अपक्रांतीच्या नियमास अनुसरून तिचा अनादि अज्ञेयशक्तींत एकदम लय व्हावा असे मानणें चमत्कारिक आहे, व हें तत्त्व मान्य करण्यास आपली बुद्धि जरा कचरते असेंही स्पेन्सरसाहेब म्हणतात; पण मेंदू आणि संज्ञाशाक्त निरनिराळी मानण्यास पुरावा नसल्यामुळे हाच सिध्दान्त कबूल केल्याखेरीज गती नाही असे त्यांचे म्हणणें आहे. आत्म्यास किवा जीवास देहाव्यतिरिक्त जर राहातां येत नाही तर धर्मकल्पना मनुष्याच्या मनांत कोठून आली असा प्रश्न सहज उद्भवतो. यास स्पेन्सरसाहेबाचे असें उत्तर आहे की, स्वप्नामधील अवास्तिक अनुभवावरून आणि भूत किंवा पिशाच्च इत्यादिकांच्या गोष्टींवरून जीव हा शरीरास सोडून राहूं शकतो अशी खोटी कल्पना प्रथमतः रानटी मनुष्याच्या मनांत आली, आणि त्याच कल्पनेची वाढ होऊन त्यावर धर्माची इमारत उभी करण्यांत आली. स्पेन्सरसाहबांचे हें मत म्याक्समूलरादिकरून विद्वानांस मान्य नव्हर्त. व त्यांनीं तो खोडण्याचाही प्रयत्न केलेला आहे. शिवाय जीव आणि मैद् यांचा संबंध स्पेन्सरसाहेब म्हणतात त्याप्रमाणें नेित्य नसून देहास सोडूनही जीव राहू शकतो अशाबद्दल * सोसायटी फेॉर सायकीकल रिसर्च ’ इनें अलीकड काहीं पुरावाही गोळा केला आहे. तेव्हां जीवासंबंधानें स्पेन्सरसाहेबांचे मत केव्हाही सर्वमान्य होईल असे वाटत नाही. कसेंही असेो; जीव किंवा आत्मा यासंबंधानें स्पेन्सरसाहेबांचे मत चार्वाकाप्रमाणें, आणि जगाच्या बुडाशीं जें अज्ञेय तत्त्व आहे त्या बाबतीत त्यांचे मत वेदांत्याप्रमाणे आहे असें यावरून दिसून येईल. जगांमध्यें दृष्टेत्पित्तीस येणा-या निरनिराळ्या भदांची उत्पत्ती द्रव्य आणि शाक्ते यांच्या साम्यावस्थेपासूनच उत्पन्न होते असें ज त्यांचे मत तें वैशेषिक मतास जरी विरुद्ध आहे तरी सांख्याच्या मताशीं मिळतें. तेव्हां एकंदर विचार करतां परमेश्वर, जीव आणि जडसृष्टि यासंबंधाचीं स्पेन्सरसाहेबांची मतें अनुक्रमें वेदांत, चार्वाक आणि सांख्य यांच्या मतांच्या मिश्रणानें झाली आहेत असें म्हणावें लागतें. परंतु यांत जें चावीकमताचे मिश्रण आहे तें जुन्या चार्वाकमताहून अत्यंत भिन्न आहे हें पूर्णपणें लक्षांत ठविले पाहिजे. देहाबरोबर जीवाचाही नाश होतो असें जरी स्पेन्सरसाहेब मानतात तरी चार्वाकाप्रमाणें * ऋणं कृत्वा घृतं पिबेत् ’ या चैनी तत्त्वाचा त्यांनीं कोठेही अंगीकार केलेला नाहीं. इतकेंच नव्हे तर उत्क्रांतीचे तत्त्व समाजास व नीतिशास्रास लावून सर्व समाजाचे किंबहुना मानव जातीचे हित साधून परोपकार करणें हीच जगामध्यें जीवाच्या कर्तव्याची सीमा आहे असें त्यांनीं सोपपत्तिक व आपल्या नेहमींच्या पद्धतीनें अनेक शास्रांतील दृष्टांत देऊन प्रतिपादन केलें