' सुघरेल, पण व्यर्थ दवडलेली घटका कशानेही मिळावयाची नाहीं. यावरून वेळेचें मोल व ती व्यर्थ न दवडण्याची आवश्यकता ध्यानांत येईल. ही गोष्ट - अधिक चांगली समजण्याकरितां आपण अशी कल्पना करूं की, 'क्ष' आणि 'ज्ञ' हीं दोन माणसें प्रत्यहीं अनुक्रमें रात्री दहा वाजतां निजावयास जाऊन पहिला इसम सकाळी सहा वाजतां व दुसरा आठ वाजता उठत असतात. असा हा त्यांचा क्रम चाळीस वर्षे चालू होता, चाळीस वर्षांचे शेवटी दोबांच्या वेळेचा हिशोब करून पाहतां 'क्ष' चे एकुलतीस हजार तास ह्मण तीन वर्षे १५१ दिवस आणि १३ तास इतका 'ज्ञ' पेक्षां जास्त भरला ! असा विलक्षण वेळतफावत पाहून क्ष "चे काळीज दुभंग होऊन तो 'ज्ञ, बरोबर टक्कर देण्याकरितां त्या पुढे अगदी बरोबर सहा वाजतां उठू लागला. आपली बरोबरी करण्याकरितां 'ज्ञ' तयार झाला हैं पाहून 'क्षस' हर्ष वाटला परंतु मीति मात्र मुळीच वाटडी नाही. कारण मागील चाळीस वर्षे पावेतो त्याने वेळेची जी काटकसर केलेली होती तिच्या योगाने आपल्या पूर्व कमांत फरक न करत 'ज्ञ पेक्षां दररोज भाठतास अधिक वेळ दहावर्षे पावेतो त्यास वापरायास सांपडला ! याच गोष्टीचें विसृत स्वरुप ध्यानांत आणले असतां 'क्ष' ने 'ज्ञ' पेक्षा आपले आयुष्य १० वर्षांनी अधिक वाढविलें असें ह्मणावें लागेल! ही गोष्ट जरी रुपकांत मोडण्या सारखी आहे, तरी तेव्हढ्य' नें वेळेचे महत्वास बाघ येणारा नाहीं; निदान ते कसेंहि अस तरी इतकें मात्र अगदी निर्विवाद आहे की, अळ , '
पान:लोकमित्र १९००.pdf/६३
Appearance