पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

होतं, सारेजण तीन - चार दिवसापासून उपाशी होते, ते त्याही आधी दोन दिवस जेवले नव्हते. कारण जंगली पाला उकडून खाल्ल्यामुळे पोट दुखत होते. चालण्याचे श्रम व अंगात मुरलेला ताप यामुळे एक एक पाय उचलणं तिच्या जिवावर येत होत.
 आणि दोन - एक किलोमीटर अंतर त्यांनी जेमतेम कापलं असेल नसेल, साधी ठेच लागल्याचे निमित्त होऊन ठकूबाई अडखळून पडली आणि राघू-मैना तिच्याकडे धावले. तिचं डोकं रस्त्यावरचं मैनेनं आपल्या मांडीवर घेतलं, ठकूबाई नुस्ती तडफडत होती!
 “दादा, वयनी, लई तरास होतोय, म्या आता जिंदा हात न्हाय आन् तेच बरं हाय, म्या अशी कपाळकरंटी, तुमास्नी भार!"
 "असं बोलू नये ठकुमाय, तू मह्या पाठची भण - आगं, जीवात जीव हाय तोवर म्या सांभाळीन तुला. आसं बोलू नये. जरा दम खा इथंच!” राघू कळवळून म्हणाला.
 जवळच एक वडाचं जंगली झाडं होतं, तिच्या सावलीत त्याने व मैनानं तिला आधार देत आणलं व फडतरावर निजवलं, “म्या पानी आनतो, जरा दम खा. ऊन कमी जालं म्हंजे निघू गावास्नी.”
 पाणी प्याल्यामुळे व विश्रांतीमुळे ठकूबाईचं कण्हणं जरा कमी झालं होतं. थोड्या वेळानं तिचा डोळा लागला. तिच्या बाजूलाच मैनाही जरा लवंडली. राघू समोर खेळणाच्या मुलांकडे लक्ष देत गुमान बसून राहिला.
 उन्हं उतरत होती तेव्हा मैना उठली आणि सहज म्हणून तिनं ठकूबाईच्या कपाळावर हात ठेवला. मघाशी चटके देणारं कपाळे आता थंडगार पडलं होतं. ती चकली, तिच्या मनात भीतीची शंका उमटली व ती किंचाळली. “धनी, जरा इकड या. पगा, पगा - ननंदबाईचं कपाळ आक्षी थंडगार लागतंया.”
 राघनं पढे होऊन ठकबाईच्या कपाळावर हात ठेवला, तिचा हात हाता था। आणि गदगदून म्हटलं, “कारभारणे, आपली ठकुमाय गेली - मेला ग..."
 तहसीलदार शिंदे सुन्न झाले होते. सकाळपासन त्यांना छळणारी टोचणी अधिक तीव्रतेने दंश करू लागली होती.
  राघू सागताना अडखळत होता, थांबत होता. एवढे एका वेळी प्रदीर्घ बोलायची त्याला सवय नव्हती. शब्द आठवत नव्हते आणि बहिणीच्या आठवणीनं तो गदगदून येत होता, पण डोळे कोरडे होते! नजर सुन्न होती...!
 "ऐकलंत ना रावसाहेब, हा - सरळ सरळ भूकबळीचा प्रकार नाही तर काय आह! विसपुते म्हणाले, “त्या दिवशी म्हणजे परवा एका पत्रकार मित्राला घेऊन मी

या हाती. रस्त्याच्या शेजारी ही राघू व त्याचे कुटुंब भेटलं. ठकूबाई तिथं मृतावस्थेत पडलेली...!”

लक्षदीय ॥ ७९