पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/330

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 वाचकहो, “एका सर्वधर्मसमभाव रस्त्याची ही कहाणी इनसायडरला प्रशासननाम्यातील एका महत्त्वाच्या प्रशासन कौशल्याची द्योतक वाटते. ते म्हणजे कायदा व सुव्यवस्था, त्यातील सर्वात ज्वालाग्रही पैलू म्हणजे धार्मिक व जातीय संघर्ष.
 हा रस्ता व्हावा असं हिंदू-मुस्लीम समाजातील सर्वसामान्य नागरिकांना तीव्रतेनं वाटत होते. ती त्यांची भौतिक गरज होती. ती नेमकी हेरून चंद्रकांतने पावले उचलली. उपक्रम तडीस नेला. त्याने जे प्रशासनकौशल्य दाखवलं, त्याचे पैलू पाहण्यासारखे आहेत. हिंदू - मुस्लीम संघर्ष ही भारतीय प्रशावनापुढे कायम डोकेदुखी आहे. या संघर्षाला बगल देणेच बहुसंख्य प्रशासक श्रेयस्कर मानतात. हा संघर्ष चिघळली, दंगल पेटली, कोणी जखमी वा मृत झाले तर प्रशासकाची चौकशी व बदली अटळ असते, पण प्रश्न जास्तच पेटला आणि विधानसभेपर्यंत गेला तर संबंधित मंत्री चर्चेला उत्तर देताना सरळ त्याच्या निलंबनाची व खातेनिहाय चौकशीची घोषणा करतात. त्या संभाव्य भीतीमुळे कुठलाही प्रशासक असे प्रसंग टाळण्याचा प्रयत्न करतो.
 चंद्रकांतने हे आव्हान यशस्वीपणे पेलले नसते तर नोकरीच्या प्रारंभीच त्याचे खच्चीकरण झाले असते., हिंदूंनी बंद पाळून निषेध केला तरी ते उघड्यावर शेंदूर फासलेल्या मारुतीचं तथाकथित मंदिर होतं, म्हणून एका मर्यादेपलीकडे हिंदू समाजाचा रोष गेला नाही. मशीद मात्र भव्य व भरभक्कम होती आणि बाहेरच्या नेत्यांमुळे व धर्मगुरूंमुळे वातावरण तापले होते. “मी दोन्ही धर्मांना समान तराजू लावतो व प्रशासन धर्मनिरपेक्ष व तटस्थ आहे." हे चंद्रकांतने केवळ बोलण्यातून नव्हे तर कृतीतून मुस्लीम समाजावर प्रभावीपणे बिंबविण्यात यश मिळवले. निमित्तमात्र तो डाव्या विचाराचा नगरसेवक ठरला, तरी मनोमन कुठेतरी मुस्लीम समाजमन रस्त्याच्या ऐहिक गरजेच्या निर्णयाप्रत येऊन ठेपले होते. त्याला चंद्रकांतने आवाहन केले, तेव्हा अनुकूल प्रतिसाद मिळाला.
 या प्रश्नाचा एक जटिल पैलू म्हणजे अनधिकृतपणे रस्ते अडवून वा सार्वजनिक ठिकाणी मंदिर, मशिद, पुतळे वा मदरसा यासारखा धर्मसंस्था उभारण्याची वाढती प्रवृत्ती, सान्या समाजाची व प्रशासनातील धार्मिक वृत्तीच्या स्थानिक अधिका-यांची अशा धर्मस्थळांच्या बांधकामासाठी मूक संमती असल्यामुळे त्यांची उभारणी होते. प्रशासनासाठी ती कायमची डोकेदुखी ठरतात. ती पाडणे वा स्थलांतरित करणे हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न असतो. शंभरपैकी नव्याण्णव प्रकरणात ही धार्मिक बांधकामे कायम राहतात. प्रस्तुत प्रकरणासारख्या एखाद्या ठिकाणी ती हटवली जातात. एरव्ही दंगली होतात, तणाव वाढतो.

 सतत तीन टर्म निवडून येणा-या मराठवाड्यातील एका आमदाराला निवडणुकीत जबर आव्हान निर्माण झाले. त्यावर यशस्वीपणे मात करून चवथ्यांदा निवडून

३३० । लक्षदीप