( ब ) दररोजचे हजेरी पत्रक बरोबर ठेविले पाहिजे.
( ३ ) मुलें दररोज शाळेत पाठविण्याची जबाबदारी पालकांवर असते.
ज्या ठिकाणी २५ मुले नाहीत अशा मळ्यांतील मुलांनी शेजारच्या गांवच्या शाळेत जावे, किंवा दोन मळेवाल्यांनीं डायरेक्टरची मंजुरी घेऊन समाईक शाळा चालवावी. मुलांना कित्येकदां २ ते ३ मैल पर्यंतही शाळेकरितां जावे लागते.
कायद्याची अंमलबजावणी बरोबर व्हावी म्हणून पुढील प्रमाणे शिक्षाही ठरविल्या आहेत.
( १ ) पालकांनी मुलें पाठविली नाहीत तर त्यांना दंड होतो.
( २ ) रजिष्टरे बरोबर राखिलीं नाहींत तर शिक्षक व सुपरिंटेंडंट हे दंडास किंवा शिक्षेस पात्र होतात. दंड २० रु., शिक्षा १ महिना.
( ३ ) सुपरिंटेंडंटने शाळागृह बांधून देण्याची टाळाटाळ केली तर गव्हरनरला कोणीतरी अधिकारी नेमून शाळागृह बांधवून घेतां येते व झालेला खर्च मळेवाल्यांच्या मालावर जप्ति नेऊन वसूल करितां येतो.
सामानः--
( १ ) शाळेत येणाऱ्या प्रत्येक मुलाकरितां डेस्क व बेंच असलेच पाहिजे असा नियम आहे. या नियमाची बजावणी इन्फंट क्लासाबाबत मात्र सक्तीने केली जात नाहीं.
( २ ) पुस्तके, नकाशे वगैरे शाळेला सुपरिंटेंडंटने पुरवावीत असा नियम आहे.
शाळांची वेळः-दहा वर्षाच्या आतील मुलाला मळ्यावर कोणतही कामास लावण्याची मनाई आहे. म्हणून सुमारे ८ ते १ पर्यंत (५ तास)