पूर्वतयारीच्या कामांत मुलांना सहभागी करून घ्यावे.
१२) सहाध्यायदिनात ज्या विषयाचे अध्ययन झाले असेल त्याचे टिपण वर्गाने सादर
करावयाचे आहे अशी पूर्वकल्पना मुलांना देऊन ठेवावी.
सहाध्यायदिनाच्या वेळी
प्रत्यक्ष सहाध्यायदिनाच्या वेळी जर पूर्वतयारी व्यवस्थित झाली असेल तर मुले
उपक्रमात बुडून जातात. या वेळी शिक्षकांनी अभ्यासविषयासंदर्भात व विद्यार्थ्यांची
निरीक्षणे नोंदवून ठेवावीत. विचार करायाला लावणारे प्रश्न निर्माण करावेत. प्रश्नांची
उत्तरे द्यावीत. मुले व इतर व्यक्ती यांतील दुवा बनावे.
या वेळात शिक्षकाने शिक्षकाची भूमिका कमी व प्रेरकाची भूमिका अधिक
करावी. शक्य तेथे स्वत: प्रकाशचित्रे काढून ठेवावीत म्हणजे मग नंतर चर्चेच्या वेळी
याचा उपयोग होतो.
सहाध्यायदिनानंतर
सहाध्यायदिनानंतर त्याचे अनुधावन केले नाही तर घेतलेले सर्व श्रम वायाच
जातील. त्यामुळे नियोजनातच या मागोव्याची योजना आखलेली असावी. असा मागोवा
अनेक पद्धतींनी घेता येईल.
१) विद्याथ्र्यांनी सहाध्यायदिनाच्या वेळी घेतलेल्या अनुभवांवर मुक्तलेखन करावे.
२) सहाध्यायदिनाच्या उपक्रमांची जी उद्दिष्टे शिक्षकांनी ठरवली असतील त्याच्या
आधारे मुद्दे काढून मुलांनी लेखन करावे.
३) उद्दिष्टांच्या आधारे प्रश्नावली तयार करून ती मुलांकडून भरून घ्यावी. व तिचे
विश्लेषण करून त्या आधारे वर्गात चर्चा घ्यावी.
४) त्या दिवशी घेतलेल्या विशेष अनुभवांवर, जाणवलेल्या प्रश्नांवर, शिकलेल्या
कौशल्यांवर, घेतलेल्या माहितीवर वर्गात चर्चा व्हावी, घ्यावी.
५) वर्गाची छोट्या गटांत विभागणी करून प्रत्येक गटाला त्या दिवशीच्या अनुभवातील
अनुभव वाटून देऊन मग त्या गटाने त्याच्या आधारे छोटे टिपण लिहावे. ह्या टिपणांचे सर्वांसमोर
वाचन, निवेदन व्हावे. त्या अनुषंगाने प्रतिक्रिया देत चर्चा व्हावी.
६) विद्यार्थ्यांनी जर त्या दिवशी काही प्रश्नावल्या भरून घेतल्या असतील तर त्याचे
विश्लेषण करून त्या आधारे निष्कर्ष काढावा. या सा-याचा अहवाल तयार करावा.
७) अशा उपक्रमांतून काही नवे उपक्रम सुचले तर ते करण्याचा आग्रह धरावा.
त्यासाठी नजीकच्या काळात मुलांना संधी उपलब्ध करून द्यावी.
८) काही विद्यार्थ्यांना त्या विषयांतील अधिक वाचण्यासाठी, पाहण्यासाठी प्रेरित
करावे.
रूप पालटू शिक्षणाचे(२५)