पान:रूप पालटू शिक्षणाचे (Roop Paltu Shikshanache).pdf/२७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सहाध्यायदिनाचा उपक्रम आखण्यापूर्वी शिक्षकाच्या मनात त्याच्या हेतूंबद्दल स्पष्ट जाणीव असली पाहिजे.
 * सहाध्यायदिनाच्या उपक्रमातून विद्याथ्र्यांना गट म्हणून त्यांच्या सभोवतीच्या वास्तव परिस्थितीशी आंतरक्रिया करण्याची संधी उपलब्ध होत असते.
 १) गटांतर्गत आंतरक्रिया
 २) गट व परिसरातील नैसर्गिक संस्था यांतील आंतरक्रिया
 ३) गट व परिसरातील मानवनिर्मित संस्था (Artificial systems) यांतील आंतरक्रिया
 ४) गट व समाजातील विविध व्यक्तीयांमधील आंतरक्रिया.
अशा अनेक प्रकारच्या आंतरक्रिया प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष पातळ्यांवर (बौद्धिक, मानसिक स्तरावरील) मुक्तपणे घडू देणे हा सहाध्यायदिनाचा एक हेतू आहे.
 * विद्यार्थ्यांना अनुभवांना मुक्तपणे सामोरे जाऊ दिले तर त्या अनुभवांची उत्कटता वाढते. त्यामुळे मनाची संवेदनशीलता वाढवणे हाही या उपक्रमामागचा मुख्य हेतू असणे जरूरीचे आहे. यातून जाणीवेची जागृती व विकास यांना सुरुवात होईल.
 * सहाध्यायदिनातून मुलांमुलींना विविध प्रेरणा मिळाव्यात.
 * विद्याथ्र्यांच्या शालेय अभ्यासक्रमात अनेक विषय मर्यादित स्वरूपात अथवा मूलभूत पातळीवर येतात. या विषयांचा व्यावहारिक जगाशी संबंध जोडणे हेही सहाध्यायदिनाच्या निमित्ताने करता येते.
 * एकाच विषयाचा विविधांगी अभ्यास प्रभावीरीत्या करण्यासाठी गटाने अभ्यास करणे हे साधन उपयुक्त ठरते. हा विश्वास निर्माण करणे, अशा अभ्यासाची तंत्रे, पद्धती, यांचा मुलांना परिचय होणे असाही एक हेतू सहाध्यायदिनाच्या उपक्रमातून साध्य होऊ शकतो.
 * गटाशी जुळवून घेता येणे.
सहाध्यायदिन उद्दिष्टे
 वर उल्लेख केलेल्या हेतूंच्या पूर्ततेसाठी सहाध्यायदिनाचा उपक्रम आखला पाहिजे. हा उपक्रम ठरविण्यापूर्वी तो उपक्रम कोणत्या उद्दिष्टांसाठी आखणार आहोत अशी एक अथवा अनेक उद्दिष्टे आधी मांडली पाहिजेत. पुढे काही उद्दिष्टे नमुन्यादाखल दिली आहेत.
 उदा. :- ग्रामीण जीवनाचा परिचय
 १) ग्रामीण अर्थरचनेचा परिचय
 २) ग्रामीण समाजजीवनाचा परिचय





रूप पालटू शिक्षणाचे(२१)