पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/82

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१४ जुलै, १९४७)
 इस्लामने लोकशाही प्रथम आणली हा मुद्दा जीनांनी पुन्हापुन्हा मांडलेला आहे. 'प्रत्यक्ष कृती' कार्यक्रम जाहीर करताना झालेल्या पत्रकार परिषदेतही ते म्हणाले आहेत - 'Muslims have learnt democracy 13 centuries ago.' (YET – 'Time of India, 1st August, १९४७) याहीपूर्वी पाकिस्तानातील अल्पसंख्यांकांचे काय?" या प्रश्नाला उत्तर देताना मुसलमान नेहमी अल्पसंख्यांकांशी उदारतेने वागले असल्याची इतिहासाची साक्ष आहे अशी त्यांनी उत्तरे दिली आहेत. (पहा - "Modern Islam in India" Smith.)

 जीनांच्या या उद्गारांच्या संदर्भातच त्यांनी जाहीर केलेल्या पाकिस्तानच्या तथाकथित धर्मनिरपेक्ष धोरणाची शहानिशा करता येणे शक्य आहे. त्याचबरोबर मागाहून त्यांनी कोलांटी उडीही मारली आहे. सिंध बार असोसिएशनपुढे पैगंबर दिनानिमित्त केलेल्या भाषणात ते म्हणतात - काही मंडळींनी हे राज्य शरियतवर आधारलेले असावे असा आग्रह धरला आहे, तर काही मंडळी शरियतचा राज्याशी काहीही संबंध असता कामा नये असे म्हणतात. (पहा - Religion & Politics in Pakistan - Leonard Birden, University of California Press, Los Angeles, १९६३. पृ. १००) वरील जीनांच्या भाषणाच्या उताऱ्याचे भाषांतर - “पाकिस्तानची भावी घटना शरियतविरोधी असेल अशी चिंता का पसरली आहे ते मला समजू शकत नाही. काही जण पाकिस्तानची भावी राज्यघटना शरियतवर आधारलेली असावी असे आग्रहाने सांगतात, तर इतर काही जण निव्वळ गोंधळ माजवून देण्याच्या दुष्ट हेतूने (deliberately want to create mischif) शरियत कायदाच रद्द करा असा प्रचार करतात." २५ जानेवारी १९४८ रोजी पाकिस्तान दिनानिमित्त सिंध बार असोसिएशनपुढे केलेले भाषण - डॉन, २६ जानेवारी, १९४८.) जीनांच्या या सगळ्या निवेदनांचा आणि वर्तनाचा नीट अर्थ लावण्याची जरुरी आहे. ते धर्मनिरपेक्ष राज्याची घोषणा करतात. परंतु हे राज्य इस्लामच्या सामाजिक न्यायाच्या चौकटीत त्यांना बसवायचे होते, इस्लामने लोकशाही प्रथम अंमलात आणली किंवा मुसलमानांनी इतरांना नेहमी उदारतेने वागविले आहे असल्या हास्यास्पद सिद्धांतांवर त्यांनी जो सतत भर दिलेला आहे त्यावरून हे लक्षात येते. ही विधाने पाकिस्तानच्या स्थापनेनंतरचे त्यांचे भारतविरोधी धोरण, आधीची अखंड भारतात काही अटींसह राहण्याची त्यांनी घेतलेली भूमिका, वेगळ्या मतदारसंघांचा आग्रह, मुस्लिम सभासदांच्या बहुमतानेच मुसलमानविषयक कायदा होऊ शकेल हा आग्रह, त्यानंतर मागितलेली समान भागीदारी आणि मुस्लिम समाज हे एक राष्ट्र आहे या भूमिकेतून मागितलेले मुस्लिम बहसंख्यांक प्रदेशाचे वेगळे राष्ट्र ह्या गोष्टींशी सुसंगत आहे. त्या राष्ट्रात इस्लामी सामाजिक न्यायाच्या चौकटीत सर्वांना समान नागरिकत्व लाभेल ही त्यांनी घेतलेली भूमिका आणि त्याचबरोबर इस्लामने नेहमीच इतरांना उदारतेने वागविले आहे, मुसलमान कधी इतरांवर अन्याय करीतच नाहीत, त्यांचा इतिहास हा न्यायाचा आणि सहिष्णुतेचा आहे ही धर्मनिष्ठा असलेले आणि धर्मनिष्ठ नसलेले, सुशिक्षित आणि अज्ञानी, धर्मवेडे आणि उदारमतवादी, या सर्वच प्रकारच्या मुसलमानांनी आजवर नेहमी घेतलेल्या उर्मट आणि नैतिक अहंकाराने माखलेल्या भूमिकेचा त्यांनी वारंवार केलेला पुनरुच्चार यातून जीनांचे एक चित्र

भारत - पाक संबंध/८१