पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/81

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
.४.


भारत-पाक संबंध



 पाकिस्तानच्या घटनासमितीत पाकिस्तानच्या ध्येयधोरणाविषयी भाषण करताना - ११ ऑगस्ट १९४७ रोजी जीनांनी पाकिस्तान हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र होणार ही ग्वाही दिली. (पहा - जीनांचे भाषण : Times of India' दि. १२ ऑगस्ट १९४७, संपूर्ण भाषण, पृ. २०१ - २०३ - Report of the Court of Enquiry Constituted under Punjab Act II of 1954 to enquire into the Punjab Disturbances of 1953, (Munir Report), Superintendent, Govt. Printing Press, Lahore, 1954) तत्पूर्वी १३ जुलै १९४७ रोजी मुंबईला पत्रकारांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अल्पसंख्यांकांना पाकिस्तानात समान नागरिकत्व लाभेल असे सांगितले. जोपर्यंत मी सत्तेवर आहे तोपर्यंत त्यांना काळजीचे काही कारण नाही असेही ते म्हणाले. “पाकिस्तान हे धर्माधिष्ठित राष्ट्र होणार काय?" या प्रश्नाला सरळ उत्तर देण्याचेही त्यांनी टाळले आहे. धर्माधिष्ठित राष्ट्र म्हणजे काय ते मला माहीत नाही, असे ते म्हणाले. एका वार्ताहराने पुन्हा म्हटले, धर्माधिष्ठित राष्ट्र म्हणजे मुस्लिम धर्मपंडितांनी चालविलेले राज्य. या पत्रकाराला धर्माशास्त्रानुसार चालणारे राज्य असे म्हणावयाचे होते. जीनांनी मुद्दामच प्रश्नाला बगल दिली. ते म्हणाले, “भारतात तर हिंदू पंडित राज्य करीत आहेत, त्याचे काय?" समजा भारतात मौ. आझाद पंतप्रधान झाले असते तर जीना भारताला मुस्लिमांचे राष्ट्र म्हणाले असते काय ? या वार्ताहर परिषदेत त्यांनी एक मुद्दा मुद्दामच मांडला आहे आणि जीनांची भलावण करणारांनी त्याचा उल्लेख करण्याचे सतत टाळले आहे. जीना पत्रकारांना म्हणतात. “I am afraid, you have not studied Islam. We learnt democracy 1300 years ago." (पहा - जीनांची पत्रकार परिषद, 'Times of India' दि.