पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/46

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



नाहींत असे जाहीर झाले. पहिला आदेश प्रेषितांच्या लग्नाआधी येतो आणि दुसरा आदेश लग्नानंतर येतो यातील विसंगती मुसलमान बुद्धिवाद्यांनी कधीच मान्य केलेली नाही. आयेशा ही प्रेषितांची आवडती पत्नी होती. प्रेषितांशी लग्न झाले तेव्हा ती नऊ वर्षांची होती. त्यामुळे मुलीचे वय नऊ वर्षांचे झाल्यानंतर ती वयात आली असे मुसलमान मानतात. (भाषावार पुनर्रचना समितीचे प्रमुख कै. न्या. मू. फाजलअली यांच्या एका न्यायाधीश मित्राने मला पुढील गोष्ट सांगितली. हे न्यायाधीश फाजलअलींच्या शेजारी राहत असत. फाजलअलींची लहान मुलगी या न्यायाधीशांच्या घरी यायची. ती नऊ वर्षांची होताच एकाएकी यायची बंद झाली. या न्यायाधीशांनी 'मुलगी हल्ली येत का नाही' असे विचारले असता ती आता वयात आली आहे, बाहेर हिंडणार नाही असे फाजलअलींनी सांगितले.) वस्तुत: स्त्री वयात येणे ही एक शारीरिक आणि स्वाभाविक क्रिया आहे. परंतु आयेशा ही प्रेषितांची पत्नी असल्यामुळे तिचे ज्या वयात लग्न झाले ते मुसलमानांनी मुसलमान स्त्रियांना ऋतुप्राप्ती होण्याचे वय मानले.
 आयेशाच्या जीवनाविषयी असेच प्रवाद आहेत. प्रेषितांचा जावई आणि मागाहून चौथा खलिफा झालेला अली आणि आयेशा यांच्यात जबरदस्त हाडवैर होते. या वैराचे कारण गंमतीदार आहे. एकदा प्रेषित आयेशाला बरोबर घेऊन एका मोहिमेवर गेले होते. तेथून परतताना आयेशाचा दागिना हरवला म्हणून तिने आपला उंट थांबविला. ती दागिना शोधीत असता गफलतीने तो उंट आणि काफिला पुढे गेला. मागाहन तीनचार दिवसांनी तिला कोणीतरी प्रेषितांपाशी आणून पोचविले. या प्रकरणी चर्चा चालली असता अली म्हणाला, ती नेहमीच असे करते. आयेशा आणि अली यांच्या वैराला यापासून आरंभ झालेला आहे. पुढे अली खलिफा झाल्यानंतर वैधव्यात असतानादेखील ती उंटावर स्वार होऊन अलीविरुद्ध लढाईला ठाकली. (म्हणूनच या लढाईला उंटांची लढाई म्हणतात.) (पैगंबरांच्या) पत्नींनी त्यांच्या मृत्युनंतर घराबाहेर पडू नये असा कुराणाचा आदेश आहे. तो आयेशाने धुडकावला असेच येथे म्हटले पाहिजे. शिवाय आयेशा आणि अली किंवा मागान अली आणि मुआविया यांच्यातील युद्धे केवळ सत्तेपायीच झाली. ही मंडळी इस्लामच्या कोणत्या उच्च आदर्शासाठी लढली याची चर्चा मुसलमान विचारवंतांनी, इतिहासकारांनी एकदा केलेली बरी.

 या सर्वच प्रकारांबाबत मुसलमान विचारवंतांनी काहीही (टीकात्मक) भाष्य केलेले नाही. खलिफांच्या काळात मुसलमानांची आपसांत यादवी युद्धे झाली. त्यात कुरेशी जमात सत्ता आपल्या हाती ठेवण्यासाठी धडपडे. प्रेषितांनंतर झालेल्या चार खलिफांपैकी तीन त्यांचे सासरे किंवा जावईच कसे झाले? उस्मानच्या काळात वेगवेगळ्या अर्थांची अनेक कराणे सांगण्यात येऊ लागली. हा गोंधळ नष्ट करण्यासाठी उस्मानने हफसा या पैगंबरांची पत्नी असलेल्या त्यांच्या मुलीने सांगितलेले कुराण तेवढे ग्राह्य मानले आणि बाकीची नष्ट केली. हफसाने सांगितलेले कुराणच खरे का मानावे? प्रेषिताचा नातू हसन याने असंख्य बायका करण्याचा उच्चांक गाठला. याला विनोदाने लोक 'अनेक घटस्फोट देणारा थोर पुरुष' म्हणत. या सद्गृहस्थांनी किरकोळ पेन्शन घेऊन मुआवियाला खलिफापद बहाल केले. दसरा नातू हुसेन याच्या शोकान्त मृत्यूमुळे त्याच्याभोवती हौतात्म्याचे वलय पसरले गेलेले आहे. परंतु

मुसलमानांच्या धार्मिक चळवळी /४५