पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/45

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

इस्लामचा स्वीकार केल्याखेरीज त्यांना मुसलमान व्यक्तीशी लग्न करता येत नाही. चिकित्सेच्या परंपरेचा अभाव हे या अवस्थेचे मुख्य कारण आहे. चिकित्सा कॅथलिक धर्मीयांनीदेखील अद्याप टाळलेलीच आहे. परंतु ख्रिश्चनांत प्रॉटेस्टन्ट पंथ जन्माला आला. हिंदू धर्मात चिकित्सेला नेहमीच वाव राहिला आहे. इस्लाममध्ये प्रॉटेस्टंट चळवळ होऊच शकलेली नाही आणि म्हणून धर्मशास्त्र टीकेपासून बचावले आहे. त्यामुळेच सुधारणावादी मुसलमानी मनही अंतर्यामी सनातनीच राहिले आहे. म्हणूनच प्रेषित महंमदांबद्दल काही टीकात्मक मजकूर कुठे प्रसिद्ध झाल्यानंतर धार्मिक न म्हणविणाऱ्या सुशिक्षित मुसलमानांनीदेखील नापसंती व्यक्त करावी याचे आश्चर्य वाटत नाही.
 मुसलमानांच्या सगळ्याच धर्मश्रद्धा प्रेषित महंमदांभोवती एकवटलेल्या आहेत हे हास्यास्पद आहे. व्यक्तिपूजेचा हा एक विचित्र आविष्कार आहे. प्रेषित महंमद कितीही थोर असले तरी ते मनुष्य होते आणि माणसातले गुणदोष त्यांच्यात असणे स्वाभाविक आहे. (त्यांच्या स्वभावाचे, कर्तृत्वाचे आणि दोषांचेदेखील विवेचन का करता येऊ नये?) उदाहरणार्थ, अरबस्तानात इस्लामपूर्व काळात बहुपतित्व नव्हते, बहुपत्नीत्व होते असे मॉन्टगोमेरी वॅट सांगतात. (पहा - 'Propheted in Mecca') वस्तुत: हे खरे मानले तर प्रेषित महंमदांनी बहुपत्नीत्वाची चाल चारांपर्यंत मर्यादित केली हे खरे ठरत नाही. उलट बहुपतित्वाचे स्त्रियांचे स्वातंत्र्य त्याने हिसकावून घेतले आणि पुरुषांना अनेक बायकांची लालूच दाखविली असा याचा अर्थ होत नाही का? वस्तुस्थिती काहीही असो. मुसलमान विचारवंतांनी वास्तविक हे आव्हान स्वीकारायला हवे होते आणि तत्कालीन अरब सामाजिक परिस्थितीबाबत संशोधन करणे आवश्यक होते. मॉन्टगोमेरी वॅट यांचे प्रतिपादन खरे ठरल्यास ते स्वीकारण्याची तयारी दाखविली पाहिजे. कुठल्याही मुसलमान समाजशास्त्रज्ञाने हा प्रयत्न केल्याचे अजून ऐकिवात नाही. उलट ही प्रेषित महंमदांची निंदा आहे. अशी टीका करताना ते दिसतात.

 प्रेषित महंमदांच्या वैवाहिक आयुष्याविषयीदेखील मुसलमान अतिशय संवेदनाक्षम बनतात. त्यांनी एकूण अकरा लने केली. मुसलमानांनी एकाच वेळी जास्तीत जास्त चार विवाह करावेत या आदेशाशी त्यांचे वर्तन विसंगत होते. प्रेषित महंमदांच्या जैनबशी झालेल्या लग्नाच्या संबंधात एक वेगळाच प्रवाह आहे. जैनब ही झैद त्यांच्या गुलामाची पत्नी होती. झैद गुलामीतून मुक्त झाल्यानंतर प्रेषित महंमदांकडेच राहिला. प्रेषित महंमदांनी त्याला आपला मानीव पुत्र मानले. पुढे झैद आणि जैनब यांचा घटस्फोट झाला आणि प्रेषित महंमदाने जैनबशी लग्न केले. वस्तुत: आपल्या लेकीसुनांशी लग्न करू नका असा आदेश कुराणात आलेला आहे. प्रेषित महंमदांच्या या लग्नानंतर काही लोकांनी टीका केली. त्यांना त्यांच्या आयुष्यात विरोधक असणे स्वाभाविक होते. प्रेषित महंमद आज कोट्यवधी जनतेला पूज्य आणि आदरणीय वाटतात. तेव्हा काहींना तसे वाटत नव्हते. सर्व थोर व्यक्तींना तत्कालीन काळात विरोधक किंवा निंदक असतातच. केवळ प्रेषित महंमदच नव्हे तर ख्रिस्त, श्रीकृष्ण, राम या सर्वांबाबत हे म्हणता येईल. तेव्हा जैनबशी लग्न केल्यानंतर प्रेषित महंमदांवर टीका होणे अपरिहार्य होते. परंतु या लग्नानंतर कुराणात दुसरा आदेश आला आणि प्रेषिताला सुना

४४/राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान