पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/43

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 शतकांपूर्वीच्या इतिहासाविषयी अंधभक्ती बाळगणारे मुसलमानी मन गेल्या शंभर वर्षांतील हिंदू-मुस्लिम संबंधाच्या इतिहासाकडे निरपेक्ष दृष्टीने पाहू शकेल ही अपेक्षाच व्यर्थ आहे. म्हणूनच सर सय्यद अहमदखान यांची नंतरची हिंदूविरोधी वक्तव्ये मुसलमान लेखक उद्धृत करीत असतात. खिलाफतच्या दंगलीत हिंदूवर झालेल्या अत्याचारांचा निषेध तर राहिलाच, त्यांची कबूल द्यायलाही ते तयार नसतात. (बेग यांनी तर मलबारमधील खिलाफत दंगलीचे खापर हिंदूंच्या माथ्यावर फोडले आहे. हिंदू जमीनदारांनी ब्रिटिशांशी सहकार्य केले म्हणून तेथे हिंदूविरोधी दंगली झाल्या अशी त्यांनी दंगलींची उपपत्ती लावली आहे. (पहा - बेग - करंदीकर पत्रव्यवहार - 'Humanist Review' जुलै - सप्टेंबर १९६९) खरा प्रश्न दंगलीत झालेल्या अत्याचारांचा आहे. बेग यांनी गृहीत धरलेले कारण खरे मानले तरी या अत्याचाराचे समर्थन कसे काय होते? मुसलमान नेत्यांनी या अत्याचारांबाबत मुसलमान समाजाला दोष दिला नाही, आवरले नाही. उलट मुसलमानांनी आपले पवित्र कर्तव्य केले असा युक्तिवाद मुस्लिम पुढाऱ्यांनी केला हा टीकाकारांचा आक्षेप आहे. बेग या मुद्याला सफाईने बगल देतात.) मुजिद यांच्या पुस्तकात खिलाफत चळवळीतील अत्याचारांची चर्चा टाळण्यात आलेली आहे. (पाकिस्तानचे श्री. कुरेशी आणि अझिज अहमद यांचा दृष्टिकोन अधिक मानवतावादी आहे. हे मान्य केले पाहिजे. कुरेशी यांनी दंगलीबाबत मुसलमान समाजाला दोष दिला आहे, तर अझिज अहमद यांनी दंगलींचे प्रकार लज्जास्पद होते असे स्पष्ट म्हटले आहे. मात्र गंमत अशी की फाळणीनंतर पाकिस्तानात झालेल्या हिंदू-विरोधी प्रचंड दंगलींचा त्यांच्या पुस्तकात कुठे उल्लेख नाही. पश्चिम पाकिस्तानातून जवळजवळ साऱ्याच हिंदूशिखांच्या झालेल्या स्थलांतराबद्दल खेदाचा एक शब्दही त्यांच्या विवेचनात आढळत नाही.) फाळणीच्या काळात झालेल्या अत्याचारांचे एकतर्फी विवेचन जवळजवळ सर्वच मुसलमान लेखकांनी केले. भारतात झालेल्या मुसलमानविरोधी दंगलींबद्दल दुःख व्यक्त करताना हिंदूविरोधी दंगलींची आणि पाकिस्तानात घडलेल्या क्रौर्याचा साधा उल्लेखही न करण्याची जवळजवळ सर्वच मुसलमान लेखकांनी 'खबरदारी' घेतली आहे. आपल्या देशातील अल्पसंख्यांकांबाबत आणि विशेषतः हिंदू अल्पसंख्यांकांबाबत साधे विवेचनही पाकिस्तानातील मुसलमान लेखकांच्या पुस्तकात सापडत नाही. (In Diferent Saddle's या आपल्या पुस्तकात (पृ. १४७ - ४८) जीनांचे एके काळचे चिटणीस एम. आर. ए. बेग यांनी फाळणीच्या वेळी झालेल्या हत्याकांडासाठी आणि हिंदूंना पाकिस्तानातून हुसकून काढले, या दुर्दैवी घटनेसाठी जीनांच्या 'ओलीस' कल्पनेला किंवा हॉस्टेज थियरीला दोष दिला आहे. पाकिस्तान होणार असे दिसू लागल्यावर हिंदू बहसंख्य असलेल्या प्रांतातील मुसलमानांमध्ये घबराट उत्पन्न झाली. त्यांना धीर देऊन त्यांचा राजकीय पाठिंबा टिकविण्यासाठी पाकिस्तानात हिंदू सुखासमाधानाने राहिले तर भारतातल्या मुसलमानांनाही चांगली वागणूक मिळेल ही भाषा सुरू केली. पण या 'निर्विकार' भूमिकेचा निषेध करावा तितका थोडाच आहे. त्यांनी स्वतः मुसलमानांमध्ये हिंदूविरुद्ध एवढे विष पेरले होते की मुसलमान हिंदूंबरोबर राहण्याससुद्धा तयार नव्हते. अनेकांनी भारत सोडला आणि पाकिस्तानात स्थलांतर केले. आणि काँग्रेस व हिंदू जेवढे मुस्लिमद्वेष्टे आहेत असा जीनांनी प्रचार केला त्याच्या एकदशांश जरी ते असते तर

४२/राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान