पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/28

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
.२.
मुसलमानांच्या धार्मिक चळवळी

भारतातील इस्लामीकरणाची प्रक्रिया अपूर्ण राहिल्याच्या जाणिवेतून शाह वलिऊल्लाचा इ.स. १७६५ मध्ये उदय झाला. वलिऊल्लापूर्वी सिरहिंदीसारखे धार्मिक नेते इस्लामच्या प्रसारासाठी सत्तेचा वापर करण्याची हाक देत होते. (म्हणून तर अकबराच्या मृत्यूनंतर 'बरे झाले, इस्लामच्या दिव्यावरील झाकण दूर झाले' असे उद्गार सिरहिंदीने काढले.) आता तर सत्ता हातातून निसटू पाहत होती. ह्या परिस्थितीत खरा प्रश्न धर्मविस्ताराचादेखील नव्हता. ही सत्ता कशी टिकून राहणार हा होता. या दृष्टीने भारताच्या मुसलमानी पुनरुत्थानवादी चळवळीतील वलिऊल्लांचे स्थान फार महत्त्वाचे आहे. त्यांनी प्रथमच धार्मिक पायावर मुसलमानांना संघटित होण्याचे आवाहन केले. भारतातील अल्पसंख्यांक मुसलमान समाजाच्या भल्यासाठी या देशात मुसलमानांची सत्ता असली पाहिजे असाही त्यांचा आग्रह होता. मराठ्यांचे पारिपत्य करण्यासाठी अहमदशहा अब्दालीला पाचारण करणारे जे पत्र त्यांनी लिहिले त्यात ते म्हणतात;
 "We appeal in the name of God to divert your attention to this affair and earn the glory of waging a holy war (जिहाद - ए - फिसबिलिल्ला) and rescue the Muslims from the hands of Non - believers.
 If predominance of Kufr (काफिर) continues at the same place, Muslim nation will disown Islam and Muslim will become such that it will not be possible for them to differentiate between Islam and Non - Islam."