पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/105

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

टाकली आहे.
 पाकिस्तानात गेल्या पंचवीस वर्षांत अल्पसंख्यांकांच्या संघटित चळवळी झालेल्या आपल्याला दिसत नाहीत. पाकिस्तानी हिंदूंना या काळात सामुदायिक सांस्कृतिक जीवन काय होते, असा प्रश्न उपस्थित केल्यास त्याचे 'काहीही नाही' असे उत्तर द्यावे लागेल. एकाही हिंदू सणाला राष्ट्रीय पातळीवर सार्वत्रिक सुट्टी देण्यात आली नाही - येत नाही. सैन्यदलातून हिंदूंची भरती करणे पद्धतशीरपणे टाळले गेले. भारतीय मुसलमानांच्या संदर्भात हा प्रश्न उपस्थित करण्यात चूक ठरणार नाही. परंतु भारतीय मुसलमानांच्या स्थानाचा प्रश्न बाजूला ठेवला तरी पाकिस्तानात हिंदूंना राष्ट्रीय जीवनात स्थान देण्याचे पद्धतशीर प्रयत्न कोणते झाले, असा प्रश्न विचारणे गैर ठरणार नाही. सरकारी नोकऱ्यांत, व्यापारात, शिक्षणात हिंदूंचे प्रमाण किती राहिले? किती हिंदूंना मंत्रिपदे देण्यात आली? आणि ज्यांना देण्यात आली त्यांना कसे वागविण्यात आले?
 जोगेंद्रनाथ मंडल केंद्रीय मंत्रिमंडळात होते. जीनांच्या मृत्यूनंतर नवा गव्हर्नर जनरल नेमण्याचा निर्णय घेण्यासाठी जी मंत्रिमंडळाची बैठक झाली तिला मंडल यांना बोलावण्यातच आले नाही. जेव्हा १९५५ साली पाकिस्तानच्या घटनासमितीत हिंदू सभासदांनी घटनेला इस्लामिक स्वरूप देण्यास विरोध केला तेव्हा 'डॉन' दैनिकाने त्यांच्यावर हल्ला चढविताना म्हटले, “नेहमी भारतात मुसलमानांना मंत्रिमंडळात स्थान दिले गेले आहे, पाकिस्तानात मात्र हिंदूंना मंत्रिमंडळात घेतले जात नाही, अशी एक टीका पाकिस्तानवर केली जाते. ही टीका चुकीची आहे. पाकिस्तानला विरोध करणारे मौ. आझाद अथवा रफी अहमद किडवाई हिंदूंबरोबर राजकीयदृष्ट्या सहभागी झालेले होते. पाकिस्तानच्या आंदोलनात सहभागी झालेला एकतरी हिंदू आढळेल का?" (पहा - 'Dawn' Karachi, 12th Dec. 1995) 'डॉन' चे संपादक अल्ताफ हुसेन जीनांचे सहकारी होते आणि ते 'पाकिस्तानातील हिंदू पाकिस्तानाच्या चळवळीशी सहभागी झाले नव्हते, म्हणून त्यांना राज्यकारभारात स्थान असता कामा नये' असे १९५५ साली उघड प्रतिपादन करीत होते.

 हा प्रश्न दोन पातळ्यांवर समजावून घेतला पाहिजे. पाकिस्तानच्या राष्ट्रवादाच्या कल्पनेच्या संदर्भात, तसेच प्रत्यक्ष व्यवहारात समान संधी देण्याचा प्रयत्न करण्याच्या संदर्भात आणि या दोन पातळ्यांचा परस्परांशी असलेला संबंधही नज़रेआड करता कामा नये. राष्ट्रवदाच्या कल्पनेच्या स्वरूपावरच व्यवहारातील वागणे अवलंबून राहते. 'राष्ट्रवाद इस्लामिक आहे.', 'मुसलमानांनी आपल्याला हिंदूंच्या जोखडातून मुक्त करून घेण्यासाठी आपले वेगळे राष्ट्र घडविले.', 'पाकिस्तानची नवी समाजव्यवस्था उच्च इस्लामी आदर्शावर उभारली जाईल.', 'पाकिस्तानातील अल्पसंख्यांक ही आमच्यावर सोपविण्यात आलेली पवित्र जबाबदारी आहे.' या व अशाच प्रकारच्या वक्तव्यांची गोळाबेरीज केली तर पाकिस्तानच्या राष्ट्रवादावर आणि इतर जमातींना त्या राष्ट्रवादात स्थान न देण्याच्या प्रवृत्तीवर प्रकाश पडतो. परंतु त्याहूनही पाकिस्तानच्या जनतेच्या मनावर या संकुचित विचारांचे प्रहार सतत होत राहिल्याने व्यवहारात तेथील अल्पसंख्यांकांवर किती विपरीत परिणाम होत असेल याची कल्पना करता येणे अशक्य नाही. जनतेसमोर संकुचित राष्ट्रवादाची उद्दिष्टे सतत ठेवून विशाल समाजरचना

१०४/राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान