पान:मृच्छकटिक.pdf/31

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ३० )


सुंदर अलंकारयुक्त हात बाहेर आलेला त्याला दिसला अर्थातच लगेच पुढेंं होऊन त्याने पालापाचोळा दूर करून पाहिलेंं. बेशुद्ध स्थितीत तेथेंं पडलेल्या वसन्तसेनेला ओळखायला त्याला वेळ लागला नाही. त्यानेंं तिला विहारांत नेले आणि तेथेंं तिची शुश्रूषा करून तिला शुद्धीवर आणली.

 निरपराध चारुदत्ताच्या सुळावर जाण्याची हकीकत त्यांच्या कानावर पडतांच तींं दोघंहि वधस्थानाकडे ताबडतोब यावयास निघाली होती. ती तेथे अगदी वेळेवर येऊन पोहोंचलीं. चांडाळांना मोठा पेच पडला. त्यांनींं पुढे काय करावे म्हणून विचारण्यासाठी पालक राजाकडे जाण्याचा विचार केला. परंतु तेवढेहि कष्ट त्यांना घ्यावे लागले नाहींत. पालक राजाचा केव्हांच निकाल लागला होता. शर्वीलकाच्या सहाय्याने आर्यकाने राज्यक्रांति यशस्वी केली होती. आतांं लोकांचा आवडता पुढारी आर्यक उज्जयिनीचा राजा झाला होता. आणि आपल्या उपकार- कर्त्याचेंं ऋण फेडण्यासाठी त्याने शर्वीलकाला तातडीने स्मशानाकडे रवानाहि केलेंं होतेंं.

 वधस्तंभावरून खाली येत असलेल्या चारुदत्ताला वंदन करून शर्वीलकाने आपली ओळख करून दिली. आतां राजा बनलेल्या आर्यकानेंं त्याला वेणा नदीच्या तीरावरील कुशावतीचेंं राज्य बहाल केल्याची राजाज्ञाहि वाचून