पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/३१६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 १९४४ साली अमेरिकेतील एका विद्यापीठात भाषण करताना चर्चिलने म्हटले होते की, "युद्ध संपले आहे. सगळ्या जगामध्ये एक 'लोखंडी पडदा' खाली येत आहे ज्यामुळे जगाचे दोन भाग होत आहेत. एका भागामध्ये समाजवादी हुकूमशाही राहणार आहे आणि दुसऱ्या भागामध्ये व्यक्तिस्वातंत्र्याची बूज राखणारी खुली व्यवस्था राहणार आहे."
 आज परिस्थिती बदलली आहे. समाजवादी व्यवस्थेचा ऐतिहासिक पाडाव झाला आणि तो 'लोखंडी पडदा' गळून पडून आता जगामध्ये फक्त खुली व्यवस्थाच राहिली आहे; पण व्यक्तिस्वातंत्र्यावर बंधने लादून सत्ता भोगण्याची चटक लागलेल्या समाजवाद्यांना हे मान्य होणार नाही.
 आता जगामध्ये एक नवा पडदा निर्माण होऊ लागला आहे. त्याला नाव ठऊद द्यायचे का अन्य काही हे इतिहास ठरवेल; पण या स्फोटक पडद्याच्या एका बाजूला लोकशाहीला विरोध करणारे सगळे हुकूमशहा तसेच एकाच प्रेषिताला किंवा एकाच व्यक्तीला थोर मानणारे, एकाच ग्रंथाला एकमेव प्रमाण मानणारे आणि दुसऱ्या बाजूला लोकशाहीवादी अशी जगाची विभागणी होणार आहे. यात कम्युनिस्ट विचारसरणीचे देश आणि आतंकवादाला थारा देणारे देश यांची दोस्ती होणार आहे. जगाचा पुढचा इतिहास या दोन महासत्तांच्या संघर्षाचा असणार आहे.
 या परिस्थितीमध्ये हिंदुस्थानात येणारे नवीन सरकार कसे असेल, कसे असावे यावर गंभीरपणे चिंतन होणे गरजेचे आहे. आपण आपल्या खुल्या व्यवस्थावादी विचारसरणीपासून जरा बाजूला झालो तरी आपल्याला पैशाची मदत करून भिडस्त बनवायला अनेकजण उत्सुक असतात. त्यांना वश होऊन चालणार नाही. या मंडळींकडे हे सर्व पैसे कोठून येतात?
 सगळ्या आतंकवाद्यांचा मुख्य धंदा मादक पदार्थांची वाहतूक करणं हा असतो. आतंकवादी म्हणजे फक्त मुसलमान आतंकवादी असे मला म्हणायचे नाही. अगदी महंत, बाबा, महाराज अशा ज्यांनी मठ स्थापन केले त्यातील जवळजवळ सर्वांचाच धंदा मादक द्रव्यांची वाहतूक हाच असतो. तेही अतिरेक्यांच्या यादीत मोडतात आणि या सर्वांना सक्षम कायदा व सुव्यवस्था नको असते म्हणून ते आतंकवादाचा वापर करतात.
 अशा सर्व बाजूंनी घेरलेल्या अवस्थेत आपण स्वतंत्र भारत पक्षाच्या 'मिशन २००९' मधील अंतिम निर्णय घ्यायला जमलो आहोत.
 शेतकऱ्यांपुढील हवामानबदल वगैरे समस्या, आतंकवादाचा हैदोस

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ३१६