पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/२२१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 शेतकरी संघटनेला २५ वर्षे झाली. या काळात आपण अनेक संकटांतून गेलो; पण काही काही आठवणी झाल्या म्हणजे मोठं आश्चर्य वाटतं की शेतकरी संघटना ही काय गोष्ट आहे!
 जेथे मी शेतीच्या आणि शेतीअर्थशास्त्राच्या अभ्यासाचा प्रारंभ केला त्या माझ्या शेताला मी 'अंगारमळा' असे नाव दिले. यातील 'अंगार' हा शब्द कुसुमाग्रजांच्या 'गर्जा जयजयकार' या कवितेतून घेतला;

पदोपदी पसरून निखारे आपुल्याच हाती
होऊनिया बेहोश धावलो ध्येयपथावरती
कधी न थांबलो विश्रांतिस्तव पाहिले न मागे
बांधू न शकलो प्रीतीचे वा कीर्तीचे धागे
एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार,
होता पायतळी अंगार

'अंगारमळा' मधील अंगार शब्द असा आला.
साने गुरुजींच्या,
रात्रंदिवस तुम्ही करीतसा काम
जीवनात तुमच्या उरला नाही राम
घाम गळे तुमचा, हरामाला दाम
येवो आता तुम्हा थोडा तरी त्वेष
येथून तेथून सारा पेटू दे देश ।

या कवितेतून 'भीक नको, हवे घामाचे दाम' स्फुरले.
पुढे नारायण सुर्वेच्या 'डोंगरी शेत माझं ग,' या कवितेतील
'या संसारा बाई सांजी येई ना
रगत गाळून अंगा धडुतं मिळं ना
कष्टाचं फळ बाई पदरात पडं ना
टिचभर पोटाला ग,
हातभर देहाला ग,
आम्ही जपावं किती?'

या ओळींमध्ये चांदवडच्या शेतकरी महिला अधिवेशनाच्या शिदोरीचे सार सापडले.
केशवसुतांच्या 'तुतारी' मधील
'जुने जाऊं द्या मरण लागुनि,
जाळुनि किंवा पुरूनि टाका,
सडत न एक्या ठायी ठाका,

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २२१