पान:महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा (Maharashtratil Mahila va Balkalyan Dasha va Disha).pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जातो. या संस्थांमध्ये शिकणारी मुले-मुली गुणवत्तेमध्ये इतर मुलांइतकीच सरस असतात. ती शाळेत नंबर मिळवतात. खेळ, संगीत, चित्रकला, एन. सी. सी., आर. एस. पी., सांस्कृतिक कार्यक्रमातही ती आघाडीवर असतात. या संस्थांत शिकून मोठी झालेली मुले सेनाधिकारी, लेखक, संशोधक, वकील, प्राध्यापक, डॉक्टर, नर्स, पोलीस अधिकारी, न्यायाधीशही झालेली आहेत. आज आपल्या राज्यातील बालगृहे म्हणजे माणूस घडवणाच्या कार्यशाळा आहेत. समाजाने कधी काळी ज्यांचे अस्तित्वच नाकारले होते अशा उपेक्षित व शल्यग्रस्त बालकांत जगण्याची जिद्द निर्माण करणा-या या संस्थांचे महत्त्व हिन्यांच्या खाणीप्रमाणे अनमोल आहे.
 निराधार मुलामुलींना संस्थेतील वास्तव्यानंतर एकदम समाजात सोडले जात नाही. त्यासाठी पुनर्वसन कार्य करणारी अनुरक्षण गृहे असतात. तिथे महाविद्यालयीन शिक्षण, औद्योगिक प्रशिक्षण, सेवा योजन, व्यवसाय मार्गदर्शन इ. सोयी पुरविण्यात येतात. या सर्वांद्वारे मुलामुलींना आर्थिक स्वावलंबन देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न केला जातो. कांही संस्थांतून विवाह, बाळंतपण, माहेरपण, मुलांची बारशी इ. करून अशा संस्था त्यांचे स्वतःचे घर होऊन जातात.

 असे असले, तरी या बालकांचे संगोपन, शिक्षण, सुसंस्कार व पुनर्वसनाचे कार्य करणाच्या संस्था समाजाकडून उपेक्षित राहतात याचे दुःख वाटते. पूर्वी गावाबाहेर हरिजन वाडे असायचे. ते उपेक्षित व अस्पर्श असायचे. बदलत्या समाज संक्रमणात गाव आणि हरिजन वाड्यातील अंतर कमी झाले. पण बालगृहांसारख्या संस्था मात्र आजही प्रासंगिक दया दाखविण्याचीच ठिकाणे राहिली आहेत. आयुष्यभर आपण अनाथाश्रम, बालगृहांसमोरून जात-येत असतो. पण आत डोकावण्याचे औदार्य आपण दाखवत नाही. घरी अपेक्षेप्रमाणे कमी पाहुणे आले की, उरलेल्या जेवणाचे काय करायचे, दिवाळीचा उरलेला फराळ काय करायचा, असे प्रश्न सोडविण्याचे ठिकाण इतकीच जर या संस्थांची आपल्या लेखी किंमत असेल तर, आपले सामाजिक मन निकोप आहे असे म्हणता येणार नाही. अनेक क्लब, संघटना, मंडळे, ट्रस्ट वर्तमानपत्रात आपल्या कार्याची जाहिरात करण्यासाठी या संस्थांचा वापर करतात हे कितपत योग्य आहे? वर्षातून

महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण : दशा आणि दिशा...५१