बेड्या घालणे यासारख्या व्यवहारास पायबंद घाल्ण्यात आला आहे. तो अशासाठी की, एक तर ती निष्पाप, अज्ञानी असतात. ब-याचदा ते संगत, प्रलोभन, बहकविणे इत्यादीचे बळी असतात. अशा स्थितीत त्यांचे बाल्य जपले-जोपासले पाहिजे. अकारण मुलांना अटक, कोठडीत ठेवणे, संशयित म्हणून दीर्घकाळ व वारंवार दावे लावणे यावर प्रतिबंध करण्यात आला आहे. अगदी अपराधी बालकासही हे सर्व हक्क उपलब्ध होतात यावरून या हक्कामागील उदारता स्पष्ट होईल. १८ वर्षांच्या आतील मुलांना कायद्याने ‘गुन्हेगार' ठरविता येत नाही. या मागे सर्व प्रकारच्या अमानुष व्यवहारातून मुलांना मुक्त ठेवण्याची धडपड स्पष्ट होते. चुकलेल्या मुलांना चूक सुधारण्याची संधी देण्याचे अंगिकारलेले तत्त्व या संदर्भात महत्त्वाचे आहे. कायदा, कलम, खटले, पोलीस, कोठडी, बेडी, साक्ष, निकाल, शिक्षा या सान्यांपासून मुलांची केलेली मुक्ती हा एका अर्थाने त्यांचे निष्पापपण जपण्याचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न होय.
बालक हक्कांची जगभरातील अनेक देशांनी केलेली जपणूक पाहता आपल्याकडे घर-शाळांतून या संदर्भात जाणीवपूर्वक करण्यास भरपूर वाव आहे. बालक हक्कांचा आदर म्हणजे मुलांचे बाल्य (Childhood) गौरवित करण्यासारखे आहे. 'रोज विकासाच्या ऐरणीवर उभ्या असलेल्या मुलांच्या गरजांना ‘उद्या' हे उत्तर असूच शकत नाही, कारण त्यांचं नाव 'आज आहे' म्हणणारा कवी गॅब्रिअल मिस्ट्रल मला मुलांच्या संदर्भातील सर्वाधिक संवेदनशील व द्रष्टा कवी वाटतो. खलील जिब्रानचे ‘प्रोफेट' मधील ‘बालके' हे स्फुट काव्य म्हणजे बालक हक्कांसंदर्भात पालकांना केलेले सुंदर मार्गदर्शनच होय. तो म्हणतो, “तुमची बालके तुमची नव्हेत. तुमच्या द्वारा ती जन्माला आली तरी तुम्ही केवळ निमित्तमात्र आहात. तुम्ही त्यांना आपले प्रेम द्या. पण आपले विचार मात्र देऊ नका. कारण त्यांना स्वतःचे विचार असतात. तुम्ही त्यांच्या शरीरासाठी घर बांधा. त्यांचे आत्मे मुक्त असू द्या. त्यांच्यासारखे बनण्याचा तुम्ही जरूर प्रयत्न करा, मात्र तुमच्यासारखे त्यांना बनविण्याचा वेडेपणा करू नका. कारण जीवन मागे जात नाही, भूतकाळाबरोबर रेंगाळतही नाही.' बालक हक्कांची सनद मुलांना नवा उषःकाल घेऊन आली आहे. मित्रांनो, त्यांना ते मोकळे आकाश, ती उंच शिखरे, ती विशाल मैदाने तन, मन, डोळे भरून पाहू द्या; जी तुम्ही कधी स्वप्नातही