विनातक्रार स्वेच्छा सवलती देते, अनाथ, निराधार, बालगुन्हेगार बालकांची व त्यांचे संगोपन व पुनर्वसन कार्य करणाच्या स्वयंसेवी संगोपन व पुनर्वसन कार्य करणाच्या स्वयंसेवी संघटना नि संस्थांची त्यांच्या एकंदरच सेवाभावी कार्यपद्धतीमुळे परपीडेची वृत्ती नसल्याने त्यांची सतत आबाळ व उपेक्षा होत आहे, ही अत्यंत चिंतेची बाब असून शासनाने सत्वर या संबंधात पाऊल उचलणे आवश्यकच नाही तर अनिवार्यही झाले आहे.
विविध योजनांतर्गत येणाच्याऱ्या लाभार्थीच्या निर्वाह भत्त्यातील नुकत्याच झालेल्या वाढीमुळे शासनाचा सापत्नभाव व पक्षपातीपणा अधिक स्पष्ट झाला आहे.
शासकीय मागासवर्गीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा निर्वाह भत्ता
अशा वसतिगृहातील विद्यार्थ्यांना पूर्वी भोजन खर्चासाठी २२५ रुपये व इतर खर्चासाठी ७५ रुपये असा एकूण दरमहा ३०० रुपये निर्वाह भत्ता दिला जायचा. आता तो दुप्पट करण्यात आला असून तो मासिक ६०० रुपये झाला आहे. शासनाच्या या उदार निर्णयाबद्दल मन:पूर्वक अभिनंदन! या नव्या निर्णयाचा लाभ शासकीय मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृहातील ८००० विद्यार्थ्यांना होणार असून या वाढीपोटी शासनास मासिक २४ कोटी ८० लाखांचा बोजा सहन करावा लागणार आहे. शासनाच्या या नव्या निर्णयामुळे या वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यात १०० टक्के (दुप्पट) वाढ झाली आहे. मुळातच इतर योजनांतील लाभार्थीना मिळणाच्या निर्वाह भत्त्याच्या तुलनेत जुना निर्वाह भत्ता दुप्पट होता (इतर लाभार्थीचा निर्वाह भत्ता रु. १२५ आहे) आता तो नव्या वाढीमुळे इतर लाभार्थीना मिळणाच्या निर्वाह भत्त्याच्या चौपट झाला आहे, हे या संदर्भात लक्षात घ्यायला हवे.
खासगी मागासवर्गीय वसतिगृहातील विद्यार्थी नव्या वाढीपासून वंचितच?
असे असले तरी वरील नव्या वाढीचा लाभ खाजगी मागासवर्गीय वसतिगृहात राहणा-या विद्यार्थ्यांना मिळणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्राच्या कानाकोप-यात अनेक शिक्षण संस्था व स्वयंसेवी संस्थांमार्फत मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृहे चालविली जातात. या संस्थांत सुमारे १ लाख मुले प्रवेशित