पान:महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा (Maharashtratil Mahila va Balkalyan Dasha va Disha).pdf/136

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वाढणाच्या व घरी-दारी वाढणाच्या मुलींच्या संस्कारात ठळक फरक दिसून येतात ते जाणीवपूर्वक प्रयत्नांच्या अभावी. अबोल, लाजच्या, बुज-या, आत्मविश्वास गमावलेल्या, नेहमी दुस-याच्या दयेवर जगण्याची करुणा भाकणा-या, क्षणिक नि शुल्क प्रलोभनाला बळी पडणाच्या संस्थाश्रयी निराधार बालिकांचा खरा प्रश्न असतो तो आपुलकी, सहानुभूती, सौहार्दता, त्यासाठी मातृत्व, भाव असलेला कर्मचारी अशा संस्थांस असणे आवश्यक आहे.
 संस्कारमय शिक्षण
 शिक्षणाच्या सार्वत्रिकरणापुढे संस्थाश्रयी निराधार बालिकांना सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा लाभ मिळत आहे. विविध संस्थांमध्ये शालांत परीक्षेपर्यंतचे शिक्षण आज सहजी उपलब्ध झाले आहे. असे असले तरी या संस्थांमधील सुमारे २० टक्के बालिका विविध कारणांसाठी शिक्षणापासून वंचित आहेत. अशांसाठी कायदेशीर अडसर, या मुलींवर संस्थांत अकारण आणली गेलेली दडपणे दूर करणे अगत्याचे आहे. शिक्षणाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन या बालिकांना महाविद्यालयीन, विद्यापीठीय शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. ब-याच संस्थांनामध्ये अनास्थेची स्थिती असल्याने मुलींना शालांत शिक्षणानंतर घरी बसविले जाते. शिक्षण हे व्यक्तिमत्त्व विकास व स्वावलंबनाचे प्रभावी साधन आहे. शिवाय काळाबरोबरच ते व्यक्तीस प्रागतिक बनविते हे लक्षात घेऊन संस्कारमय शिक्षणाच्या सर्व संधी, सुविधा कोणताही अडसर न आणता बालिकांना उपलब्ध करून द्यायला हव्यात.
 व्यावसायिक प्रशिक्षण

 संस्थाश्रयी निराधार बालिकांना व्यावसायिक प्रशिक्षणाची संधी आज अपवादानेच मिळते. त्याची अनेक कारणे आहेत. एकतर सध्याच्या गुणात्मक स्पर्धेच्या जगात या मुली मागे पडतात. कारण संस्थांत्मक प्रशासन व्यवस्थेत अपु-या कर्मचारी संख्येमुळे लक्ष पुरविणे केवळ अशक्य असते. त्यामुळे गुणवत्तेच्या कसोटीवर प्रशिक्षण कार्यक्रमात त्यांच्या निवडीचे निकष स्वतंत्र असणे आवश्यक असूनही ते प्रत्यक्ष अंमलात नसल्याने प्रवेशांचा प्रश्न निर्माण होतो. शिक्षण प्रशिक्षण संस्थांमध्ये मागासवर्गीय व अपंगांना राखीव जागा आहेत, पण अशा बालिकांना त्या अद्याप देण्यात आल्या नाहीत. खर्चीक पाठ्यक्रमांत संस्थांमध्ये या मुलींना

महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण : दशा आणि दिशा...१३३