पान:महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा (Maharashtratil Mahila va Balkalyan Dasha va Disha).pdf/117

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मुलांची पसंती तर बिरबल, तेनालीराम फक्त २४ टक्के. साने गुरुजी हे गेल्या शतकातील बालकांचे लेखक तसेच ते आजच्याही! सहस्रक ओलांडून हा लेखक गांधी युगाची संस्कारधारा जिवंत ठेवतो. महात्मा गांधी नि साने गुरुजी ही भारतातील अजरामर व्यक्तिमत्त्वं झाली तर कुणाला आश्चर्य वाटायला नको. मुलांना शाळेची पुस्तकं आवडतात. तब्बल ८८ टक्के मुलांची ही पसंती म्हणजे ‘बालभारती' एकाधिकार गौरवच!
 शिक्षकांबद्दल या मुलांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं अमर्याद सकारात्मक आहेत. संस्थांतील मुलांबद्दल समाजातील शिक्षक, कनवाळू असतात असा दस्तुरखुद्द अनुभव. सगळ्यात गमतीची गोष्ट अशी की, ६५ टक्के मुलं आपला अभ्यासक्रम स्वतः बनवू इच्छितात. आपले अभ्यासक्रम अधिक बाल्यकेंद्रित व्हायला हवेत, असं हा कौल सुचवतो. शिक्षकांनी शाळेत आपणास प्रयोग करू द्यावेत असं म्हणणं मांडणारी २५ टक्के मुले आहेत. हे उत्तर आपलं आजचं शिक्षण अधिक सृजनशील, आनंदी व्हावं हेच सुचवतं.
 ही उत्तरावली निवडक संस्थांतील असली तरी प्रातिनिधिक मानायला हवीत. मी महाराष्ट्रभरच्या साच्या अशा संस्था जवळून पाहिल्या, अनुभवल्या आहेत. मुलांची ही उत्तरं शासन व समाजाने गांभीर्याने घ्यायला हवीत. वंचित मुलं वांछित बनायची तर संस्थांच्या तुरुंगसदृश भिंती समाज रेट्यांच्या बुलडोझरने जमीनदोस्त करायला हव्यात. शासन यंत्रणेस पाझर फुटेल असे सांदी-कोपरे यंत्रणेत गेल्या ६० वर्षांत अभावानेच आढळले. बालकल्याण विभागाचे स्वतंत्र काडर असलं तरी इथले उच्चाधिकारी (आयुक्त) महसूल खात्यातली मानसिकता असलेले असतात. तोही कायमचा या काडरमधला असला पाहिजे. जपानसिंगापूरमध्ये असे असल्याने तिथे हे कार्य अधिक परिणामकारकपणे चालतं, हे मी तेथील भेटीत अनुभवलं आहे. बंदिस्त बालकल्याण संस्थांची रचना व कार्यपद्धती तेव्हाच बदलेल जेव्हा या खात्याचा मंत्री संस्थेतील एखादा मुलगा-मुलगी होईल, असं एखादा नाटककार विजय तेंडुलकर म्हणले होते ते खरं आहे.

 संजय हळदीकरांनी मुलांत राहून, मूल होऊन मुलांचं जे भावविश्व समाजासमोर आणलं त्याबद्दल सारी संस्थांतली मुलं त्यांची ऋणाईत राहतीलच, पण या निमित्ताने मुलांशी नातं सांगणाच्या साध्या प्रयोगशील ताई-दादांनी आता भविष्यात

११४...भीती आणि भिंतींमधील बंदिस्त बाल्य