पान:भूमी आणि स्त्री.pdf/३११

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
परिशिष्ट -१

भुलईचे गीत

  शांताबाई गायकवाड (वय सुमारे ७५) यांचे कडून मिळालेले गीत -

नागर पंचीमीच्या दिशी गोविंदा चारित होता गायी ss
गायी चारिता चारिता गेला टेकाजवळी
टेकात पाहतो तो अंडे हैती -
अंडे गोईंदान देखिले आला धावत पळत
माता मज अंडे तळून देई ....
अंडे मातानं फोडिले अंडे हैत नागिनीचे
गेली पाच उतरंडी काढल्या
चंदनचुली पेटविल्या श्रावन शेवया रांधिल्या ...
गोईंदा भोजन केला, सरसर गेला माडीवरी
घेतली खुंटीची दुशाल, गोईंदा निजला गती झाला....
नागिन गेली टेकाजवळी, टेकात पाहती अंडे नाही
नेले असतानं गोईंदान, आली धावत येशीच्या येसकरा
गोईंदाचा वाडा कोनता? ....
तुझं गोईंदापासी काय? त्याची हरपली गाय
आली गोईंदाच्या वाड्याला ....
सरसर माडीवरी गेली, डाव्यापायाची गनगोळी (करंगळी)
तिनं कडाकडा डंकिली ....
माता त्याची हाक मारी, झोप कशी रे लागली
गायी नगरीच्या सुटल्या ....
माता गेली गोईंदा जवळी, ऊर दणाणा बडविती
केस कुरले तोडिती ....
अरे अरे गोपाळा बाळा, जावे भाभीला आनाया
गेला घोड्याच्या पागला .....
झिन मोत्याचा सजविला, गेला वेशीच्या बाहेरी

३०६
भूमी आणि स्त्री