पान:भूमी आणि स्त्री.pdf/२४३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

होते. त्यांनी तोडलेल्या लंगराचा अत्यन्त जड अशा लोखंडी साखळीचा तुकडा त्यांच्या देवघरात पूजला जातो.
 महाप्रभू चैतन्य आणि इंदिरा११ -
 मुरळीची प्रथा खूप जुनी आहे. १५१०-११ च्या सुमारास बंगालचे महाप्रभू चैतन्य दक्षिण यात्रेस निघाले असता जेजुरीस आले होते. आईबाप आपल्या मुली खंडोबाच्या पत्नी म्हणून अर्पण करतात हे ऐकल्यावर ते दुःखी झाले. त्यांनी आपल्या करुणामय मधुरवाणीने मुरळ्यांसमोर परमार्थाचा उद्देश विशद करून सांगितला. त्यातील अनेक जणींना पापमय जीवनाबद्दल पश्चाताप झाला. इंदिरानामक मुरळीने जेजुरी सोडली. खंडोबाची गोष्ट नावाचे चोपडे रेव्ह. जे.मरेमिचेल याने प्रसिद्ध केले आहे. त्यात मुरळी करण्याच्या वाईट प्रथेवर टीका केली आहे.
 नाथांचे समकालीन १२शेख महंमद बाबा यांनी या प्रथेवर प्रखर हल्ला चढविला, ते लिहितात -

मुरळ्या कुलस्वामिच्या दासी । त्यासी रमता कंटाळेत ना अपेशी ।
मल्हारी न करीच काही त्यांशी । कां सत्त्वे सांडवला ?
कुळकन्येस बोल लाविला मल्हारीने । ऐसे विटंबिले त्याच्या देवपणे
तो पूजिल्या केवी तुटती बंधने । लक्ष चौऱ्यांशीची ॥

 लावणी आणि मुरळीची गाणी यातील साम्य : एक अंदाज -
 मुरळीची गाणी खूपशी लावणीच्या जवळ जाणारी आहेत.

वय सोळा कोवळी काया, हूडपणात घुंगरू पाया
लागे नाचाया, लागे नाचाया, लागे नाचाया
पोर बावरी झाली पाहा जेजुरीला जाया ।
नव्या नव्या वाऱ्याने हिचे भारावले अंग।
या अशा वयातच बदलू पाहे दंग
उतावीळ मल्हारीसंगे लगीन लावाया॥....
बाणून करूनिया थाट
शिरी ग भरूनी दुधाचे माठ जी ।।

२३८
भूमी आणि स्त्री