पान:भूमी आणि स्त्री.pdf/१८२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

  पाऊस आला घरात चला
 'चहूर चहूर चांग भला' म्हणजे चोहोकडून सर्व दिशांनी सर्वांचे चांगले व्हावे. पाऊस येतोय. धरणीला त्यात आकंठ भिजू द्या. धरणी आणि पावसाच्या मिलनातून उद्याची समृद्धी बहरणार आहे. त्यांच्या एक होण्याला आपला अडथळा नको. चला घरात चला. स्त्रीपुरुष समागमातून, निसर्गशक्तींच्या समागमातून नवनिर्मिती होते. समृद्धी येते. ही प्राचीन समाजात श्रद्धा होती. त्यामुळे स्त्रीपुरुष समागमाबाबत अनैतिक घृणास्पद अशी भावना त्यांच्यात नव्हती. विवाह ही कल्याणकारी संकल्पना होती.
 तुळसाबाई देवकाते या भावठाणा या ग्रामीण भागात शेती करणाऱ्या महिलेने सांगितले की बैलाला 'बसवराज' म्हणतात. त्याचा विवाह नवरी बरोबर न होता करवलीबरोबर झाला. त्या संदर्भातील त्यांनी सांगितलेल्या ओव्या अशा -
  दळण दळिते एका मांडिनं म्हनंऽऽ

 आला पोळ्याच सण
 बसवराजाच्या लगनाची
 नवरी ठिवली घरी
 पाचव्या सोमवारी
 बसव्याचं लगन लावी
 बैलामंदी ग बैल
 माज्या राघोबाची

सौराज्याचं लगीन...
ब्रह्मदेवानं केली चोरी
करवली नेली म्होरी
आला पोळा कारभारी
मारवती ब्रह्मचारी
बैल हिऱ्या ग चंचल
झाली पेरणी पातळ

नव्या नवऱ्याप्रमाणे बैलही रुसतात. तेलपीठाला शिवत नाहीत.

 बैलामंदी ग बैल
 शिवीना तेल मीठ

बैल बडुद्या रुसला
मांडी घालून बसला

  शेतकरीण पोळ्याला बैलांना ओवाळते. तिच्या बैलासंबंधीच्या भावना व्यक्त करताना ती म्हणते -

पोळ्याच्या दिशी बलाला तेलमीठ
दावन दावा त्याला सूर्व्या नीट

भूमी आणि स्त्री
१७७