पान:भूमी आणि स्त्री.pdf/१२८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 काय सांगू मी त्येंची करनी
 वडून माझी वेनी बालंट घाली - मी जाती आपल्या म्हायाराला
३.  नाकातली नथ कशी हालं कशी ड्रलं
 सावळे भावजायी जरा बेतानेच बोल

 माहूर गडाचा संदर्भ -
 भुलाबाईच्या या गीतांत १२माहूरगडाचा उल्लेख येतो. 'गडावर गड बाई माहूर गड.तिथला सोनार कारागीर या ओळीच्या वेळी मुली टिपरीवर टिपरी उभी करून गड उभा करतात. माहूरगडाबाबत डॉ. रा.चिं. ढेरे यांनी लज्जागौरी या संशोधनपर ग्रंथात विस्तृत विवेचन केले आहे. आर्यपूर्व भारतात योनिपूजा आस्तित्वात होती. माहूरची देवी रेणुका आहे. ही भूमिस्वरूप आहे. रेणुका म्हणजे कुमारी भूमी-कोरी भूमी. वारूळातील माती कोरी असते असे मानतात. वारुळ, भूमीच्या उपासनेत महत्त्वाचे मानले जाते. ब्राह्मण काळापासून वारूळाची माती सुफलनकारक म्हणून वापरली जाई. रेणुकेला अखंडकुमारीमानले जाते.ती पुरुषतत्त्वाला अनेक रूपांत सांभाळते, परंतु तिचे कौमार्य भंग पावत नाही अशी समजूत आहे. भूमीचे रक्षण करणारे क्षेत्रपाळ नागस्वरूपात मानले गेले आहेत. भुलाबाईच्या नमनंगीतातील साँचेसंदर्भतसेच माहूरगडाचे संदर्भ, हालोकोत्सव भूमीच्या सृजनाशी जोडलेला आहे याची जाणीव करून देतात.
 नथीचा नखरा -
 भुलाबाईच्या गाण्यांतून येणारे दागिन्यांचे संदर्भ अलीकडचे असावेत. स्त्रियांना विशेषकरून तरुण नववयसा मुलींना दागिन्यांची हौस असतेच. त्यामुळे खालील ओळीतील वनिताभाव अतिशय मनोरम वाटतो.

चला चला भुलाबाई मंदिरी जाऊ
नथ नाही तर कशी येऊ

 मंगळसूत्राप्रमाणेच नथ हे सौभाग्याचे प्रतीक मानली जाते. नथीत नाजूक शृंगाराची, समृद्धीची अभिव्यक्ती असते. स्त्रीत्वाचा नखरा नथीत गुंफलेला असतो. जुन्या स्त्रिया म्हणतात की सतरा दागिन्यांपरीस एक गरक्याची नथ नाकात घातली की बाई सजते.

भूमी आणि स्त्री
१२३