पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/393

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्याचे आजपर्यंत जे प्रयत्न झाले त्यांची फलश्रुति अशी करुणास्पद आहे.
 हे प्रयत्न फसणे अटळच होते कारण ते परिस्थितीचा सर्वांगीण अभ्यास करून ठरवण्यात आलेले नव्हते. शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा ज्यांनी सखोल अभ्यास केलेला नाही अशा पुढाऱ्यांच्या हातात शासनाची साधन संपत्ती आली. त्या साधनांचा उपयोग त्यांनी आपापल्या भागातील योजना राबवण्यासाठी केला. अनेक वेळा या योजना केवळ व्यक्तिगत स्वार्थासाठीच राबवण्यात आल्या.
 अशा या निराशाजनक परिस्थितीतून वाट काढायचे काम शेतकरी संघटनेकडे आलेले आहे. कुत्र्याच्या अंगावर दगड फेकला तर तो त्या दगडालाच चावायचा प्रयत्न करतो. तेच वाघाच्या अंगावर दगड फेकला तर तो फेकणाऱ्याच्या नरड्याचा घोट घेतो. शेतकऱ्यावर आज अनेक दगड भिरकावले जात आहे. त्या दगडाच्या मागे धावून त्याना चावून काहीही उपयोग नाही. दुसरे दगड पेकाटात बसत राहतीलच. हे दगड कोठून येतात ? ते कोण फेकत आहे? याचा अंदाज घेऊन त्याचाच बंदोबस्त सिंहाच्या पराक्रमाने करणे आवश्यक आहे.
 मग कोरडवाह शेतकऱ्यांच्या हालाखीचे मूळ कोणते? ते मूळ कारण दर केले पाहिजे. दोन-चार गावच्या किंवा हजार दोन हजार गावांमध्ये थोड्याफार योजना राबवूनसुद्धा हा प्रश्न सुटणार नाही. देशातील साडेसहा लाख खेड्यांचा जर प्रश्न सोडवायचा असेल तर त्या सर्वांच्या दुःखाचे मूळ दूर करावयास पाहिजे. एखाद्या आजारी माणसाचे रक्तच खराब झालेले असेल तर त्याच्या सगळ्या अंगावर फोड येतील. एकेका फोडावर मलमपट्टी करत बसले तर खर्च खूप होईल. वेळ खूप जाईल आणि आजार तर बरा होणार नाही. कारण रक्तच खराब असल्यामुळे नवे नवे फोड सतत येत राहतीलच. त्याला उपाय योजना म्हणजे अशा औषधाची पाहिजे की ज्यामुळे एका सुईने रक्तातील दोष नाहीसे होतील.
 आजवर शासनाने जमेल तितक्या फोडांना मलमपट्टी करण्याचे काम चालवले आहे. बहुतेक फोडावर औषध उपचार व्हायचे आहेत. मलमपट्टी झालेल्या ठिकाणी थोडी सुधारणा झाली असे काही काळ वाटले तरी फिरून तिथे फोड येतच आहेत. अशा प्रयत्नाच्या विचाराने टिकाऊ संघटना बांधणे शक्य नाही.

 भारतातील कोरडवाहू शेतकऱ्यांच्या हलाखीचे मूळ कारण त्यांना मिळणारा

बळिचे राज्य येणार आहे / ३९५