पान:बलसागर (Balsagar).pdf/18

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

and honour and the other side is cuncing and wicked and basely determined on our destruction......"
 “Reason has never played a notable part in Pakistan politics. But there now seems little to choose between the rival follies of this dispute......”
 “ There is now grave danger of communal outbreaks against the Muslims all over India......"
 इत्यर्थ असा की, 'भारत आणि पाकिस्तान दोघेही युद्धखोर आहेत. पाकिस्तान थोडे अधिक भडक माथ्याचे असले तरी दोघेही मूर्खासारखे भांडत आहेत. भारतात मुसलमानांच्या कत्तली होण्याचा फार धोका नजीकच्या काळात संभवतो.'
 आमच्या निधर्मी तपाचरणाचे, सौजन्याचे, शांतताप्रेमाचे काय हे फलित ! मित्र म्हणवणाऱ्या जाणकारांची आमच्याविषयी ही समजूत तर इतरेजनांची कथा काय ! आणि असल्या फसव्या आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेच्या भाकडकथा सांगून कच्छप्रकरणातील राजकीय पराभव झाकला जातो, ते तर अधिकच खेदजनक! शिवाजीचे उत्सव साजरे होत असले, तरी पृथ्वीराज चव्हाणाची परंपराच येथे जोरावर आहे, असे समजणे यावरून भाग पडते.

जुलै १९६५

।। बलसागर ।। १३