पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/93

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तो आपल्या साहित्यमंथनातून चौदा रत्नं भरतो का? दाखवतो का? प्रा. डॉ. चंद्रकांत पोतदार यांनी तसा प्रयत्न केला आहे.

 या ग्रंथातील कविता कालक्रमाने म्हणाल तर गेल्या दोन दशकांतील आहेत. सारे वर्तमान कवी-कवयित्री आहेत. त्यात नामांकितांबरोबर नवोदितही आहेत. गेल्या दोन दशकांतही मराठी कवी, त्यांचे काव्यविषय, शिल्प, भाषा, प्रतीक एकत्र आल्याने ‘आस्वादाची काही पाने' हे शीर्षक असलेला हा संग्रह वर्तमान मराठी काव्यावर मात्र लख्ख प्रकाश टाकतो.

 कविता महाजनांच्या ‘मृगजळीचा मासा'मध्ये विचारांचं काहर, मृत्यूची अनेक रूपं, जगण्यातील ऊर्मी आहे. जागतिकीकरणात माणूस तुटत असल्याचं शल्य ही कविता व्यक्त करते. ग्रंथाली'नं अलीकडे प्रकाशित केलेल्या प्रज्ञा दया पवार ऊर्फ प्रज्ञा लोखंडेंच्या 'मी भिडवू पहाते समग्राशी डोळा'मध्ये स्त्रीवाद कसा आहे, त्यातून स्त्रीचं समग्रपण कसं उभं राहतं हे स्पष्ट होतं. या कवितेस असलेले समकालीन संदर्भ ताजे असल्याने ही कविता हृदयाला सरळ भिडते. कवी पत्रकार असला की त्याची कवितासुद्धा चिकित्सक कशी बनते, याची वानगी आपणास विजय चोरमारे यांच्या ‘आत-बाहेर सर्वत्र'मधील कविता वाचताना मिळते. हा एक अस्वस्थ कवी आहे. तो समाजशोधक आहे. त्याला गाव, संस्कृती, नाती यांचं तुटणं अस्वस्थ । करतं. तो आतून-बाहेरून हादरून जातो; कारण त्याला सर्वत्र सांस्कृतिक हाहाकार दिसतो. 'सांजभयाच्या साजणी'मधील ग्रेसांची कविता आकांताची कविता असल्याने डॉ. पोतदारांनी नोंदलेलं निरीक्षण ग्रेसांच्या कवितांचं समीक्षकाला असलेलं आकलन स्पष्ट करतं. ती कविता आत्मसंवादी तशीच आत्ममग्नही. दुःखाचे अभिजात शिल्प घेऊन येणारी ही कविता ‘जन्म सारा शोधताना' मध्ये कवी अशोक भोईटे समग्र जीवनाचा समग्र पट मांडतात नि समजावतात. कवी माणूसशोधक होय. त्याला हळवेपणाचा लाभलेला लळा त्याच्या कवितांतून झरत राहतो. डॉ. धम्मपाल रत्नाकर ‘हॉटेल माझा देश' मध्ये एक नवं जग चित्रित करतात. सभ्यतेच्या आड दडलेलं मनुष्याचं दांभिकपण ते मोठ्या प्रत्ययकारी भाषेत आपणापर्यंत पोहोचतात व वाचक आतून-बाहेरून उद्ध्वस्त होतो. कवी श्रीधर तिळवेही इथे भेटतात. आपल्या एका भारतीय विद्याथ्र्यांचे उद्गार'मधून आपल्या समाजाचे दाहक रूप ते तितक्याच आक्रमक शब्दात व्यक्त करतात. लेखकाच्या या साच्या निरीक्षणांतून संग्रहातील कवी व कवितांचा आशयविषय स्पष्ट होतो.

 डॉ. चंद्रकांत पोतदार स्वतः कवी आहेत. संवेदनशील समीक्षकास

प्रशस्ती/९२