पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/63

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

श्याम कुरळे यांच्यामुळे वाचण्याचा योग आला आणि हा परिचय प्रपंच घडला याचा मला मनस्वी आनंद आहे.


“अंधाच्या रात्रीत मुलांच्या हाती ज्ञानदीप' व्हावे
उजळून त्यांची वाट सुखाने हसत-खेळत राहावे

.
 अशी आकांक्षा मनी ठेवून अशोक पाटील यांनी या संग्रहातील ५४ कविता लिहिल्या. खरं त्या लिहिल्या गेल्या असं म्हणणं जास्त सयुक्तिक ठरेल कारण ह्या कवितात जी उत्स्फूर्तता आहे ती लिहिल्या गेल्यासारखं क्रियापद सार्थ करणारी होय. या कवीस पहिली कविता स्फुरली ती एका विद्यार्थिनीनं लिहिलेली कविता पाहन, ‘शिष्यात् इच्छेत् पराजयः।' सारख्या

ओळी ख-या ठरतात ते अशा कवींच्या प्रांजळ स्वीकृतीतून. विद्यार्थी कधी-कधी शिक्षकांचा खरा गुरू ठरतो हे अशा प्रसंगातून अधोरेखित होतं.
 ‘ज्ञानदीप' बालकविता संग्रह विषय, आशय, मांडणी, प्रतीक रचना, उपमा, दृष्टान्त अशा अनेक अंगाने विचार केला तर वैचित्र्य आणि विविधतेने नटलेला असा काव्यसंग्रह होय. त्यात शाळा, गुरुजी, आजी, घड्याळ, चांदोबा, वाघोबा, मनीमाऊ, मोतीभाऊ, बाहुली, पतंग असं सारं बालसुलभ विषयविश्व प्रतिबिंबित आहे. बालविश्वाच्या कुतूहलास निसर्ग नेहमीच खुणावत असतो. तसा तो या संग्रहातही वाकुल्या देत राहतो. यात ढग, पाऊस, पक्षी, इंद्रधनुष्य आहेत पण ते पारंपरिक नाहीत. अशोक पाटील यांच्या या कवितेत बदललेल्या परिस्थितीची जाण असल्यामुळे यात पर्यावरणाचा विध्वंस, लोडशेडिंग, फास्टफूडचा जमाना, संगणक असे विषय आपसूक येतात. त्यात बालसुलभ जिज्ञासेची जी झालर आहे, त्यामुळे ही कविता बालगोपाळांना भुरळ घालणारी ठरते. यात गेयता आहे. हितगूज आहे. लळा आहे. ताल व संगीतही आहे. त्यामुळेच ही कविता मी गंमत म्हणून माझ्या नातवास वाचून दाखवल्या तेव्हा त्याचं मान डोलावणं, मुरका घेणं, टाळी देणं, डोळे विस्फारणं सारं या काव्याच्या यशस्वीतेची दाद देणं होतं, हे वेगळे सांगायला नको. |
 ‘ज्ञानदीप'मधला आरसा असा हुबेहुब आहे


‘मीच तसा, तुम्ही जसे ।
प्रतिबिंबित जे रूप तसे'।
 आरशाचं स्वतःचं असं काहीच नसतं. ते असतं तुमचं प्रतिबिंबित हे ‘आरसा' कविता समजाविते. ही कविता केवळ शब्दप्रपंच नाही. ती स्वच्छता, व्यवस्थितपणा, टापटिपीच्या टीपाही मुलांना देते. म्हणून तिचं शैक्षणिक नि संस्कारी असं महत्त्व आहे. ज्ञानदीप ही कविता कळीच्या
प्रशस्ती/६२